शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:30 IST

ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम करून बांधण्यात आलेला १८७ मीटर लांबीचा, गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-बिरवाडी दरम्यानचा सावित्री नदीवर ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम केलेला पूल, गतवर्षी २ आॅगस्टला रात्री कोसळला आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

- जयंत धुळपअलिबाग : ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम करून बांधण्यात आलेला १८७ मीटर लांबीचा, गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-बिरवाडी दरम्यानचा सावित्री नदीवर ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम केलेला पूल, गतवर्षी २ आॅगस्टला रात्री कोसळला आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. याच गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते पोलादपूर या टप्प्यात १६ ब्रिटिशकालीन दगडी पूल आजही सुरू आहेत. मात्र, हे पूल वाहतुकीकरिता सुरक्षित आहेत किंवा नाही, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आजतागायत कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे या महामार्गावरील १५ ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेबाबत आजही प्रश्नचिन्ह कायम आहे.येत्या २१ ते २४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत मुंर्बतून २००० एसटी बसेसच्या माध्यमातून किमान एक लाख, सुमारे ८०० खासगी बसेसच्या माध्यमातून किमान ४० हजार आणि सुमारे १५ हजार स्वमालकीच्या खासगी चारचाकी वाहनांतून किमान ७५ हजार, असे एकूण सुमारे २ लाख १५ हजार कोकणवासीय याच १६ ब्रिटिशकालीन पुलांवरून कोकणात आपापल्या गावी जाणार आहेत.गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या या अत्यंत गभीर आणि धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई-गोवा महामार्ग व इतर प्रमुख रस्त्यांवरील खड्डे व धोकादायक पुलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेतलेल्या विशेष बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या मलमपट्ट्यांचे अनेक मुद्दे समोर आले.अपघातप्रवण ठिकाणी, तसेच धोकादायक पुलाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक तत्काळ लावण्यात यावेत, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महामार्गाशेजारील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव व संपर्क क्रमांकाची माहिती असणारे फलक महामार्गावर लावावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मुंबई-गोवा महामार्गाची नियमित पाहणी करून, अपघातप्रवण ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही स्पष्ट आदेश डॉ. सूर्यवंशी यांनी बैठकीतदिले.बैठकीला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पनवेलचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ सातपुते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण व पनवेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि गेल्या किमान १५ वर्षांपासून रायगड जिल्हा प्रशासनास आपतकालीन परिस्थितीत मदत व सहकार्य करणाºया जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.स्ट्रक्चरल आॅडिट’ रिपोर्ट नाही तरी १६ पूल धोकादायक नसल्याचा दावागतवर्षी सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गावरील पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करून ते वाहतुकीस सुरक्षित आहेत वा धोकादायक आहेत, याबाबतचे अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आदेशानुसार गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या १६ ब्रिटिशकालीन पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याचे काम ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, मुंबई या कंपनीकडे देण्यात आले होते. त्यांनी ते केले आहे. मात्र, त्याचा अहवाल आमच्याकडे नाही, अशी माहिती यानिमित्ताने संपर्क साधला असता राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. सुरवसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आणि हे १६ ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचाही दावा केला आहे.गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक कोकणातील आपल्या गावी येत असल्याने वाहनांची प्रचंड मोठी संख्या गोवा राष्ट्रीय महामार्गावर असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असते. परिणामी, अपघातप्रवण ठिकाणी तसेच धोकादायक पुलाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक तत्काळ लावण्यात यावेत, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिले आहेत.- डॉ. विजय सूर्यवंशी,जिल्हाधिकारी, रायगड

 

 

ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह- जयंत धुळपअलिबाग : ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम करून बांधण्यात आलेला १८७ मीटर लांबीचा, गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-बिरवाडी दरम्यानचा सावित्री नदीवर ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम केलेला पूल, गतवर्षी २ आॅगस्टला रात्री कोसळला आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. याच गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते पोलादपूर या टप्प्यात १६ ब्रिटिशकालीन दगडी पूल आजही सुरू आहेत. मात्र, हे पूल वाहतुकीकरिता सुरक्षित आहेत किंवा नाही, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आजतागायत कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे या महामार्गावरील १५ ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेबाबत आजही प्रश्नचिन्ह कायम आहे.येत्या २१ ते २४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत मुंर्बतून २००० एसटी बसेसच्या माध्यमातून किमान एक लाख, सुमारे ८०० खासगी बसेसच्या माध्यमातून किमान ४० हजार आणि सुमारे १५ हजार स्वमालकीच्या खासगी चारचाकी वाहनांतून किमान ७५ हजार, असे एकूण सुमारे २ लाख १५ हजार कोकणवासीय याच १६ ब्रिटिशकालीन पुलांवरून कोकणात आपापल्या गावी जाणार आहेत.गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या या अत्यंत गभीर आणि धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई-गोवा महामार्ग व इतर प्रमुख रस्त्यांवरील खड्डे व धोकादायक पुलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेतलेल्या विशेष बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या मलमपट्ट्यांचे अनेक मुद्दे समोर आले.अपघातप्रवण ठिकाणी, तसेच धोकादायक पुलाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक तत्काळ लावण्यात यावेत, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महामार्गाशेजारील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव व संपर्क क्रमांकाची माहिती असणारे फलक महामार्गावर लावावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मुंबई-गोवा महामार्गाची नियमित पाहणी करून, अपघातप्रवण ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही स्पष्ट आदेश डॉ. सूर्यवंशी यांनी बैठकीतदिले.बैठकीला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पनवेलचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ सातपुते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण व पनवेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि गेल्या किमान १५ वर्षांपासून रायगड जिल्हा प्रशासनास आपतकालीन परिस्थितीत मदत व सहकार्य करणाºया जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.स्ट्रक्चरल आॅडिट’ रिपोर्ट नाही तरी १६ पूल धोकादायक नसल्याचा दावागतवर्षी सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गावरील पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करून ते वाहतुकीस सुरक्षित आहेत वा धोकादायक आहेत, याबाबतचे अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आदेशानुसार गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या १६ ब्रिटिशकालीन पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याचे काम ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, मुंबई या कंपनीकडे देण्यात आले होते. त्यांनी ते केले आहे. मात्र, त्याचा अहवाल आमच्याकडे नाही, अशी माहिती यानिमित्ताने संपर्क साधला असता राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. सुरवसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आणि हे १६ ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचाही दावा केला आहे.गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक कोकणातील आपल्या गावी येत असल्याने वाहनांची प्रचंड मोठी संख्या गोवा राष्ट्रीय महामार्गावर असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असते. परिणामी, अपघातप्रवण ठिकाणी तसेच धोकादायक पुलाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक तत्काळ लावण्यात यावेत, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिले आहेत.- डॉ. विजय सूर्यवंशी,जिल्हाधिकारी, रायगड