शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ-दहिवली पुलावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:31 IST

कर्जत तालुक्यातील नेरळ - कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग समजला जातो. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र या मार्गावरील दहिवली पुलावर

- कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ - कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग समजला जातो. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र या मार्गावरील दहिवली पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पुलांवरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे पुलावरील वाहतूक धोकादायक बनली असून या पुलांवरील खड्डे लवकरात लवकर भरले नाहीत तर पूल कोसळू शकतो अशी भीती स्थानिक नागरिक, वाहन चालक, प्रवाशांकडून व्यक्त केली आहे. नेरळ - कळंब या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. पुढे हा मार्ग कर्जत-मुरबाड राज्य मार्गाला जाऊन मिळतो. या मार्गावर मागील वर्षीपासून अनेक वेळा खड्डे भरण्याचे काम बांधकाम विभागाकडून झाले, परंतु ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने काम करत असल्याने आणि अधिकारी कामाची पाहणी करत नसल्याने निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दोन महिन्यांतच रस्त्याची दयनीय अवस्था होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही झोपेचे सोंग घेतल्याने कोण आवरणार ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पुलावरून पाणी जाते.त्यामुळे संरक्षक पाइप पुराच्या पाण्याने वाहून जातात आणि रस्त्यावर कचरा, मोठमोठे खड्डे पडतात. यावर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.या खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. प्रवासी वाहनचालक, स्थानिक नागरिक या पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. चार दिवसांपूर्वी या पुलावरून पुराचे पाणी गेल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे, परंतु याकडेही बांधकाम विभागाला लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुलाला हादरा बसून पावसात हा पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सुमारे ५० ते ६० गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आक्र मक भूमिका घेतली असून दोन दिवसांत दहिवली पुलावरील खड्डे भरले नाही तर ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. उंची वाढविण्याची मागणी नेरळ-दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पुलावरून पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. तसेच संरक्षक कठडे पाण्याच्या प्रवाहात वाकतात तर काही रेलिंग वाहत जातात. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे. कर्जत तालुक्यातील काही पुलांच्या दुरु स्तीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. नेरळ-दहिवली पुलाचीही लवकरात लवकर पाहणी करून दुरु स्ती प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल व पुलावरील खड्डेही लवकर भरण्यात येतील.- चंद्रशेखर सहनाल, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जतनेरळ-कळंब रस्त्यावरील दहिवली पुलावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलावरील खड्डे जर लवकरात लवकर भरले नाहीत, तर हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या पुलावरील रस्त्याचे खड्डे लवकर भरावे, अन्यथा ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल. - यशवंत भवारे, ग्रामस्थ, दहिवली-नेरळ