शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

आरसीएफ विरोधात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

By admin | Updated: August 24, 2015 02:33 IST

आरसीएफ प्रशासनाने गेली ३० वर्षे १४२ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवले आहे. कंपनीचे विस्तारीकरण न झाल्याने प्रश्न

अलिबाग : आरसीएफ प्रशासनाने गेली ३० वर्षे १४२ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवले आहे. कंपनीचे विस्तारीकरण न झाल्याने प्रश्न अजून गंभीर बनला आहे. आरसीएफ प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जमीन नाही आणि नोकरीही नाही अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. अलिबाग तालुक्यातील बोरीस, गुंजीस, थळ, वायशेत अशा सुमारे १२ गावांतील शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी थळ प्रकल्पासाठी दिल्या होत्या. यातील १४२ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही कायम आहेत. मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी उपोषण, मोर्चे आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी स्वत:च्या स्वार्थापुरता पाठिंबाही दिला मात्र प्रश्न काही सोडविले नाहीत, अशी धारणा प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. खासदार तथा अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या अध्यक्षतेखाली आरसीएफ प्रशासनासोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय झाला होता, तरीही कंपनीने तो निर्णय धाब्यावर बसविला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर कंपनीच्या विस्तारीकरणानंतर प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले जाईल, असे आश्वासन आरसीएफ प्रशासनाने दिले होते. प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे सुनील सप्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)