शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अलिबाग परिसरात पेपर इंडस्ट्री उभारण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:15 IST

बहुराष्ट्रीय कंपनी : आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

आविष्कार देसार्ई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारी पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे. यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या अथवा देशपातळीवरील कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी आली तरी जिल्ह्याचा विकास होणे महत्त्वाचे आहे, असे मत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मात्र, आधीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, त्यानंतरच नव्याने भूसंपादन करा, असा सूर स्थानिक पातळीवर आळवला जात असल्याने भूसंपादनाच्या प्रक्रियेला विरोध होणार असल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये एमआयडीसीमार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सुमारे एक हजार ३०० एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या परिसरामध्ये नेमका कोणता उद्योग उभारण्यात येणार आहे. याची माहिती स्थानिकांसह शेतकऱ्यांना नाही. प्रकल्प कोणता येणार आहे याचीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांनी जमिनी कशा काय द्यायच्या, असा सवाल येथील ग्रामस्थ परशुराम म्हात्रे यांनी केला आहे. एमआयडीसीने याआधीच टाटा पॉवर प्रकल्पासाठी सुमारे एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन केले आहे. प्रकल्प येण्याआधी प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रकल्पच झाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पार धुळीला मिळाल्या आहेत. त्यामुळे आधी प्रकल्पग्रस्तांना दिलेली लेखी आश्वासने पूर्ण करा, त्यानंतरच नवीन संपादनास सुरुवात करा, अन्यथा भाजपकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये १०२ एकर परिसरामध्ये शेततलावांची निर्मिती केली आहे. त्या शेततळ्यांवर स्थानिकांचा रोजगार अवलंबून असल्याने सरकारने हा १०२ एकरमधील शेततळ्यांचा परिसर वगळून अन्य ठिकाणी कोणताही पर्यावरण पोषक प्रकल्प आणावा. त्याला आमचा विरोध नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या सुट्टीवर असल्याचे सांगितले.जिल्ह्याच्या विकासासाठी होणार?च्जिल्ह्याच्या विकासासाठी अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे.च्याआधी रायगडमधील शिवसेनेचे तत्कालीन खासदार अनंत गीते यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत प्रत्येकी तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.च्पुढे त्यांची ही घोषणा हवेतच विरली होती. आता नवनिर्वाचित खासदांरानी अलिबागमध्ये पेपर इंडस्ट्री उभारण्याचे जाहीर केल्याने या ठिकाणी खरेच उद्योग उभा राहणार का? हा खरा प्रश्न आहे.इंडोनेशियन कंपनी असल्याची चर्चाच्अलिबाग तालुक्यामध्ये इंडोनेशियन कंपनी आपले हात-पाय रोवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी शहापूर-धेरंड परिसरामध्ये एका बड्या गुंतवणूकदाराने भेट दिल्याचे बोलले जाते. दिल्लीमधूनच या ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानेच या गुंतवणूकदारासोबत वरिष्ठ प्रशासकीय आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी उपस्थित होते, अशीही चर्चा आहे.