शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अलिबाग परिसरात पेपर इंडस्ट्री उभारण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:15 IST

बहुराष्ट्रीय कंपनी : आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

आविष्कार देसार्ई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारी पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे. यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या अथवा देशपातळीवरील कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी आली तरी जिल्ह्याचा विकास होणे महत्त्वाचे आहे, असे मत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मात्र, आधीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, त्यानंतरच नव्याने भूसंपादन करा, असा सूर स्थानिक पातळीवर आळवला जात असल्याने भूसंपादनाच्या प्रक्रियेला विरोध होणार असल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये एमआयडीसीमार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सुमारे एक हजार ३०० एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या परिसरामध्ये नेमका कोणता उद्योग उभारण्यात येणार आहे. याची माहिती स्थानिकांसह शेतकऱ्यांना नाही. प्रकल्प कोणता येणार आहे याचीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांनी जमिनी कशा काय द्यायच्या, असा सवाल येथील ग्रामस्थ परशुराम म्हात्रे यांनी केला आहे. एमआयडीसीने याआधीच टाटा पॉवर प्रकल्पासाठी सुमारे एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन केले आहे. प्रकल्प येण्याआधी प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रकल्पच झाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पार धुळीला मिळाल्या आहेत. त्यामुळे आधी प्रकल्पग्रस्तांना दिलेली लेखी आश्वासने पूर्ण करा, त्यानंतरच नवीन संपादनास सुरुवात करा, अन्यथा भाजपकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये १०२ एकर परिसरामध्ये शेततलावांची निर्मिती केली आहे. त्या शेततळ्यांवर स्थानिकांचा रोजगार अवलंबून असल्याने सरकारने हा १०२ एकरमधील शेततळ्यांचा परिसर वगळून अन्य ठिकाणी कोणताही पर्यावरण पोषक प्रकल्प आणावा. त्याला आमचा विरोध नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या सुट्टीवर असल्याचे सांगितले.जिल्ह्याच्या विकासासाठी होणार?च्जिल्ह्याच्या विकासासाठी अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे.च्याआधी रायगडमधील शिवसेनेचे तत्कालीन खासदार अनंत गीते यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत प्रत्येकी तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.च्पुढे त्यांची ही घोषणा हवेतच विरली होती. आता नवनिर्वाचित खासदांरानी अलिबागमध्ये पेपर इंडस्ट्री उभारण्याचे जाहीर केल्याने या ठिकाणी खरेच उद्योग उभा राहणार का? हा खरा प्रश्न आहे.इंडोनेशियन कंपनी असल्याची चर्चाच्अलिबाग तालुक्यामध्ये इंडोनेशियन कंपनी आपले हात-पाय रोवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी शहापूर-धेरंड परिसरामध्ये एका बड्या गुंतवणूकदाराने भेट दिल्याचे बोलले जाते. दिल्लीमधूनच या ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानेच या गुंतवणूकदारासोबत वरिष्ठ प्रशासकीय आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी उपस्थित होते, अशीही चर्चा आहे.