शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

देवपाडा-वंजारपाडा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:21 IST

खड्डेमय प्रवासाने वाहनचालक हैराण, रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ देवपाडा, वंजारपाडा ते चिंचवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाल्याने संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्ता प्रवासायोग्य करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. 

नेरळ-वंजारपाडा मार्गे देवपाडा, चिंचवाडी या गावांना जोडणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १० किलोमीटर अंतराच्या या रस्त्याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम झाले नाही. खेदाची बाब म्हणजे वंजारपाडा ते चिंचवाडी दरम्यानचा रस्ता खराब झाल्याने, नागरिकांना वर्षानुवर्षे या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. तसेच देवपाडा-वंजारपाडा या परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्यांना नेरळशी जोडणारा रस्ता झाला. मात्र देखभालीअभावी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या परिसरातील बहुसंख्य आदिवासी बांधव उदरनिर्वाहासाठी भाजीपाला लागवड करतात. याच मार्गाने त्यांना भाजीपाला विकण्यासाठी बाजारात जावे लागते.

कामगार वर्गाला याच रस्त्याने प्रवास करावा लागतोे. मात्र खराब रस्त्यामुळे रिक्षाचालक या गावांना यायला कचरतात. दुचाकी चालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो. बऱ्याचदा अपघातही घडतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ रस्ता दुरुस्तीची मागणी करीत आहेत. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अद्यापही येथील नागरिक रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक