शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

उपजिल्हा रुग्णालयाकडे डॉक्टरांची पाठ; कर्जतमधील विदारक सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:04 IST

एमबीबीएस डॉक्टरांना अपेक्षेपेक्षा कमी मानधन मिळत असल्याने सेवा देण्यास नकार

- विजय मांडे कर्जत : शासनाकडून शासकीय रुग्णालयांमध्ये रुजू होणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरला सुरुवातीस जेमतेम ४५ हजार इतके मानधन तर काहींना श्रेणीनुसार थोडे जास्त मानधन मिळते. मात्र, डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा ते मानधन फारच कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे; त्यामुळे ते कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास तयार होत नसल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिली.उपजिल्हा रुग्णालयाबाबत कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी ‘आपले सरकार वेब पोर्टल’च्या माध्यमातून माहिती विचारली होती, त्या वेळी उत्तर देताना, कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण आठ पदे मंजूर असून, पाच वैद्यकीय अधिकारी व एक दंत शल्यचिकित्सक अशी सहा पदे भरलेली आहेत व दोन पदे रिक्त आहेत. एमबीबीएस डॉक्टर हे ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे येण्यास तयार नाहीत. एमबीबीएस डॉक्टरांना देण्यात येणारे मानधन फक्त ४५ हजार असल्याने डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे ते डॉक्टर शासन सेवेत यायला उत्सुक नाहीत. परिणामी, वैद्यकीय अधिकारी कमी असल्यामुळे उपलब्ध वैद्यकीय अधिकारी यांच्यावर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडतो व मनुष्यबळ कमी असल्यामुळे रुग्णांना अपेक्षेप्रमाणे सेवा देणे इच्छा असूनही शक्य होत नाही, असा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अजित गवळी यांनी लेखी पत्राद्वारे केला आहे. यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला तज्ज्ञ डॉक्टर मिळणार की नाही, असा प्रश्न कर्जतकरांना पडला आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० बेडचे कर्जत उपजिल्हा रुग्णालय आहे. मात्र, सध्या स्थितीत त्यातील किती बेड शिल्लक आहेत हा विषयच वेगळा. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे अपघातातील जखमींनाही येथे आणले जाते. तसेच कर्जत-मुरबाड, कर्जत-कल्याण मार्गावरील अपघातातील जखमींना येथे उपचारासाठी आणले जाते. मात्र, अद्ययावत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना या उपजिल्हा रुग्णालयात उपचार न करताच, पुढे हलविण्याचा सल्ला देऊन उपस्थित डॉक्टर जबाबदारी ढकलतात. त्यामुळे संबंधित रुग्णाला पनवेल, मुंबई येथील रुग्णालयात न्यावे लागते. यामध्ये वेळ जात असल्याने प्रसंगी रुग्णाच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते.तालुक्यात १७० पेक्षा अधिक गावेपावसाळ्यात धरणात बुडालेले, धबधब्या वरून पडलेले, गिर्यारोहण करताना घसरून पडलेले असेही रुग्ण येथे येतात. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांअभावी तात्पुरते प्राथमिक उपचार करून त्यांनाही पुढचा रस्ता दाखवण्यात येतो.तालुक्यात सुमारे १७० पेक्षा अधिक गावे, वाड्या, पाडे आहेत. उपजिल्हा रुग्णालय सुरू झाले, तेव्हा सगळ्यांना येथे मोफत चांगले उपचार मिळतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती.मात्र, डॉक्टरांची रिक्त पदे, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी आदी सुविधांची उणीव, औषंधाचा अपुरा पुरवठा यामुळे होतो त्रास.एमबीबीएस डॉक्टरांना अधिक मानधनाची अपेक्षा असते. ती पूर्ण होत नसल्याने ते रुजू होण्यास तयार होत नाहीत आणि उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयात बीएएमएस डॉक्टरांची नेमणूक करू नये, असे शासकीय धोरण असल्याने पदे रिक्त राहतात. मात्र, जिल्ह्यात प्राथमिक आरोग्यकेंद्रात बीएएमएस डॉक्टरांची पदे भरून उणीव भरून काढली आहे.- डॉ. अजित गवळी, शल्य चिकित्सक,जिल्हा रुग्णालय, अलिबागवैद्यकीय अधिकारी कमी असल्यामुळे उपलब्ध वैद्यकीय अधिकारी यांच्यावर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडतो व मनुष्यबळ कमी असल्यामुळे रुग्णांना अपेक्षेप्रमाणे सेवा देणे इच्छा असूनही शक्य होत नाहीमी, आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे डॉक्टरांच्या रिक्त पदाबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यावर अधिक मानधनाभावी डॉक्टर रुजू होत नाहीत, असा लेखी खुलासा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तरी शासनाने यावर योग्य ती सकारात्मक पावले उचलून उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची नेमणूक करावी.- पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत