शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पोह्यांसाठी ‘कर्जत शताब्दी’ शेतकऱ्यांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:19 IST

कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन : शताब्दी वर्षानिमित्त भाताचे नवीन वाण विकसित

अलिबाग : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील भात संशोधन केंद्राच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, कोकणातील शेतकऱ्यांसाठी या वर्षी ‘कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. ‘कर्जत शताब्दी’ या नवसंशोधित जातीच्या भातापासून उत्तम दर्जाच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकणार आहे. परिणामी, भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. सुमारे ४० पेक्षा अधिक भाताच्या जाती कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. विद्यमान नूतन कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन होऊन शिफारस करण्यात आलेली ‘कर्जत शताब्दी’ ही भाताची पहिली जात असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहे.

कृषी विद्यापीठाच्या संयुक्त परिषदेत ‘कर्जत शताब्दी’वर शिक्कामोर्तब राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २९ ते ३१ मे दरम्यान राहुरी कृषी विद्यापीठात झालेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त संशोधन परिषदेत ‘कर्जत शताब्दी’ या नव्या भाताच्या जातीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बैठकीला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आदी शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते.

दहा वर्षांच्या संशोधनांती शोधकर्जत येथील भाताच्या बोटवेल या स्थानिक वाणापासून ही जात विकसित करण्यात आली आहे. मूळ स्थानिक जात ही उंच वाढत असल्याने शेतात लोळून या भाताचे नुकसान होत होते. मात्र, नव्याने विकसित करण्यात आलेल्या या जातीचे वाण उंच होत नसल्याने नुकसान होतनाही.बोटवेल या भाताच्या स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्षे संशोधन करून ही नवी जात विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कर्जत शताब्दी ही भाताची नवीन जात मूळ बोटवेल या भातापेक्षा जवळपास हेक्टरी दुप्पट उत्पादन देणार आहे.हेक्टरी चार टन उत्पादकतेचे बियाणे कर्जत केंद्रात उपलब्धकर्जत शताब्दी जातीच्या भातातून मिळणारा आखूड व जाड तांदूळ खास पोह्यांसाठी उपयुक्त ठरणार असून यापासून मोदकाचे पीठही उत्तम प्रकारचे होऊ शकते. रायगड, कर्जत, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग-फोंडाघाट येथील शेतकºयांच्या शेतात या नवीन जातीची गेली दोन वर्षे लागवड करून निरीक्षण संशोधन करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून जात विकसित करण्यात आली आहे. कर्जत शताब्दी हे भात हेक्टरी चार टन उत्पादन देणारे असून यावर्षी पासून रायगड कर्जत केंद्रावर कर्जत शताब्दी भाताच्या वाणाचे बियाणे शेतकºयांना उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग