शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सुक्या कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक निर्मिती; कर्जत नगर परिषदेच्या प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:49 IST

कर्जत शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, हा कचरा घनकचरा प्रकल्पावर जातो, यापैकी ओला कचरा बायोगॅससाठी वापरून त्याद्वारे पथदिव्यांसाठी वीज निर्मिती केली जाते.

कर्जत : कर्जत नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील गोळा केलेल्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, रबर आणि तोडफोड केलेल्या इमारतीच्या डेंब्रिजपासून पेव्हर ब्लॉक बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

कर्जत शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, हा कचरा घनकचरा प्रकल्पावर जातो, यापैकी ओला कचरा बायोगॅससाठी वापरून त्याद्वारे पथदिव्यांसाठी वीज निर्मिती केली जाते. मात्र, सुक्‍या कचऱ्यामधील प्लास्टिक बाटल्या, रबर, रॅपर, गाडीचे टायर, चपला आदी तसेच तोडफोड केलेल्या इमारतींच्या डेंब्रिजचे सिमेंटमिश्रित वाळू यांचे करायचे काय, असा प्रश्न नगर परिषदेला नेहमी सतावत होता. जरी हा कचरा कोणी विकत घ्यायला आला तरी तो खरेदीदार फारच अल्प किंमत देत असे. त्यामुळे नगर परिषदेला काही विशेष फायदा होत नसे आणि या वाढत जाणाऱ्या कचऱ्यामुळे जागा अडत असे त्यावर उपाय म्हणून आता ह्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक तसेच रबर यावर विशिष्ट प्रक्रिया करून घनकचरा प्रकल्प परिसरात एका शेडमध्ये गृवाला कन्स्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी यातून पेव्हर ब्लॉकची निर्मिती करणार आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका संचिता पाटील, प्राची डेरवणकर, विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, भारती पालकर, वैशाली मोरे नगरसेवक राहुल डाळिंबकर आदी उपस्थित होते.

प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भागात हे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत, त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. यापुढे तयार करण्यात येणारे पेव्हर ब्लॉक शहरात जिथे गरज आहे तिथे बसविण्यात येतील. पेव्हर ब्लॉक बनविण्यासाठी येणारा सर्व खर्च गृवाला कन्स्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करणार असून, त्यातील उत्पन्नातील काही टक्के उत्पन्न संबंधित कंपनी नगर परिषदेला देणार आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डम्पिंग ग्राऊंडमधील वाढत्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट या माध्यमातून आपोआप लावली जाईल.

डेंब्रिज आणि प्लास्टिक तसेच रबरपासून पेव्हर ब्लॉकची निर्मिती केल्याने या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या दूर झाली आहे. नगर परिषद ओडीएफ प्लस सर्टिफिकेट मिळवण्यात यशस्वी झाली आहे तसेच स्वच्छ भारत अभियान ऑल इंडिया रँकमध्ये येण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी