शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

सुक्या कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक निर्मिती; कर्जत नगर परिषदेच्या प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:49 IST

कर्जत शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, हा कचरा घनकचरा प्रकल्पावर जातो, यापैकी ओला कचरा बायोगॅससाठी वापरून त्याद्वारे पथदिव्यांसाठी वीज निर्मिती केली जाते.

कर्जत : कर्जत नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील गोळा केलेल्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, रबर आणि तोडफोड केलेल्या इमारतीच्या डेंब्रिजपासून पेव्हर ब्लॉक बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

कर्जत शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, हा कचरा घनकचरा प्रकल्पावर जातो, यापैकी ओला कचरा बायोगॅससाठी वापरून त्याद्वारे पथदिव्यांसाठी वीज निर्मिती केली जाते. मात्र, सुक्‍या कचऱ्यामधील प्लास्टिक बाटल्या, रबर, रॅपर, गाडीचे टायर, चपला आदी तसेच तोडफोड केलेल्या इमारतींच्या डेंब्रिजचे सिमेंटमिश्रित वाळू यांचे करायचे काय, असा प्रश्न नगर परिषदेला नेहमी सतावत होता. जरी हा कचरा कोणी विकत घ्यायला आला तरी तो खरेदीदार फारच अल्प किंमत देत असे. त्यामुळे नगर परिषदेला काही विशेष फायदा होत नसे आणि या वाढत जाणाऱ्या कचऱ्यामुळे जागा अडत असे त्यावर उपाय म्हणून आता ह्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक तसेच रबर यावर विशिष्ट प्रक्रिया करून घनकचरा प्रकल्प परिसरात एका शेडमध्ये गृवाला कन्स्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी यातून पेव्हर ब्लॉकची निर्मिती करणार आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका संचिता पाटील, प्राची डेरवणकर, विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, भारती पालकर, वैशाली मोरे नगरसेवक राहुल डाळिंबकर आदी उपस्थित होते.

प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भागात हे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत, त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. यापुढे तयार करण्यात येणारे पेव्हर ब्लॉक शहरात जिथे गरज आहे तिथे बसविण्यात येतील. पेव्हर ब्लॉक बनविण्यासाठी येणारा सर्व खर्च गृवाला कन्स्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करणार असून, त्यातील उत्पन्नातील काही टक्के उत्पन्न संबंधित कंपनी नगर परिषदेला देणार आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डम्पिंग ग्राऊंडमधील वाढत्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट या माध्यमातून आपोआप लावली जाईल.

डेंब्रिज आणि प्लास्टिक तसेच रबरपासून पेव्हर ब्लॉकची निर्मिती केल्याने या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या दूर झाली आहे. नगर परिषद ओडीएफ प्लस सर्टिफिकेट मिळवण्यात यशस्वी झाली आहे तसेच स्वच्छ भारत अभियान ऑल इंडिया रँकमध्ये येण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी