शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ उर्दू शाळेला पालकांनी ठोकले टाळे

By admin | Updated: February 21, 2016 02:47 IST

तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ येथील उर्दू शाळेत आठ शिक्षकांची पदे मंजूर असूनही गेल्या अनेक वर्षांपासून चार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी

कर्जत : तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ येथील उर्दू शाळेत आठ शिक्षकांची पदे मंजूर असूनही गेल्या अनेक वर्षांपासून चार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक एका पदवीधर शिक्षिकेची बदली पनवेल येथे करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकले असून शाळा बेमूदत बंद, असा फलक लावून उपोषणाचा इशारा दिला आहे.नेरळ येथे रायगड जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची उर्दू शाळा असून, २०३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक वर्षांपासून येथे आठ शिक्षकांऐवजी चारच शिक्षक कार्यरत आहेत. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युसूफ हनीफ सय्यद गेल्या दोन वर्षांपासून उपसंचालक शिक्षण विभाग मुंबई, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी, शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कर्जत यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीच करवाई झाली नाही. २३ डिसेंबर २०१५ ला कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षिकांची अचानकपणे पनवेल येथे बदली केली आहे. त्यामुळे येथे चार शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीने २७ जानेवारीस पालक सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. शाळेला शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत नेरळ उर्दू शाळेत मुलांना पाठविणार नाहीत, असा निर्णय पालकांनी घेतला आहे. (वार्ताहर)कर्जत तालुक्यात नऊ उर्दू शाळा असून, आठ शाळांतील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांचे समायोजन न झाल्याने सर्व शाळेत उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथील पदे रिक्त आहेत. - सुरेश डंबाये, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती कर्जत