शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:41 IST

श्रीरंग बारणे यांच्या सूचना : कर्जत तहसील कार्यालयात आढावा बैठक

कर्जत : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ, कर्जत, खालापूर, उरण आणि पनवेल तालुक्याला बसला आहे. या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने त्यासाठी मदत जाहीर केली आहे. या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहता कामा नये. त्यासाठी सर्व नुकसानग्रस्तांचे काळजीपूर्वक पंचनामे करावेत. त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत, खालापूरमधील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा सोमवारी आढावा घेतला. कर्जत येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र घुले, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक संतोष पाटील, वेद दांडेकर, नगरसेविका प्राची डेरवणकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबू घारे उपस्थित होते.खासदार बारणे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. त्यात कर्जत, खालापूर, उरण, पनवेल तालुक्यांना फटका बसला आहे. त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. या नुकसानीची १०० टक्के भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यासाठी पंचनामे सुरू झाले आहेत. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये. ज्यांच्या पिकांचे, आंब्यांचे, झाडे आणि घरांचे नुकसान झाले आहे त्याची १०० टक्के भरपाई दिली पाहिजे. बाधित शेतकरी, नागरिकांना मदत मिळण्यासाठीचे सर्व पंचनामे काळजीपूर्वक पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्वांना मदत मिळाली पाहिजे. त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा, असे सूचित केले.चार-पाच दिवसांत वीज सुरळीत होईलवादळाचा महावितरणालादेखील फटका बसला आहे. विद्युत तारांवर झाडे पडली आहेत. अनेक ठिकाणचे पोल पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे, पण खेड्यापाड्यातील विजेची अद्याप दुरुस्ती झाली नाही. येत्या चार ते पाच दिवसांत ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणने दिल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड