शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवा कायदा सर्वसामान्यांना देशाेधडीला लावणार; शेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 15:26 IST

कृषी, कामगार कायद्या विराेधात शेकापने आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाचे आयाेजन केले हाेते

रायगड ः केंद्रातील माेदी सरकारने कामगार, शेतकरी यांना देशाेधडीला लावणारे कायदे पारीत केले आहेत. आता त्यापाठाेपाठ माेदी सरकार विजेबाबत कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर विज दर वाढीचे संकट आेढवणार असल्याने या विराेधात शेकाप जन आंदाेलन उभारणार आहे. यासाठी आजच्या संविधान दिनी सर्वांनी संघटीत हाेऊन याचा मुकाबला करुया असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.

कृषी, कामगार कायद्या विराेधात शेकापने आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाचे आयाेजन केले हाेते. त्याप्रसंगी जाहिर सभेत आमदार पाटील बाेलत हाेते.न्याय, समता, बंधुतेची त्रिसुत्री भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या संविधान दिनी देशाला दिली हाेती. मात्र केंद्रातील माेदी सरकार नेमके घटनेच्या विराेधात कृत्य करत आहे. देशातील कामगार, कष्टकरी, शेतकरी, दलीत यांना देशाेधडीला लावून ठराविक उद्याेजकांच्या पुढे लाेटांगण घालत आहे, अशी जहरी टीका आमदार पाटील यांनी केली.माेदी सरकारने किती प्रयत्न केले तरी, देशातील नागरिक त्यांच्या पुढे झुकणार नाही हेच आपल्याला दाखवायचे आहे. यासाठी सर्वांनी संघटीत हाेऊन संघर्ष करण्याची तयारी करा. शेकाप कायम तुमच्या साेबत आहे, असे आवाहन त्यांनी केले.राेहा-मुरुड तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना सिडकाेच्या नियमानुसार लाभ दिला पाहीजे. त्यांच्या जमिनी याेग्य दर देतानाच त्यांना साडे बावीस टक्के विकसीत भूखंड देणे गरजेचे आहे असेही, त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लवकरच मुंबई-मंत्रालयावर लाॅंगमार्च काढणार आहे.

त्यामध्ये स्वतः पायी चालत जाणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.काेराेना विराेधातील लढाई आपण लवकरच जिंकू असा विश्र्वास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र माेदी यांनी देशवासीयांना दिला हाेता. मात्र आजची रुग्ण संख्ये तब्बल 92 लाखांच्या पुढे गेली आहे, तर लाखाे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आराेग्याच्या बाबतीमधील माेदी सरकारची धाेरणे चुकली आहेत अशी जाेरदार टीका माकम नेते काॅ. अशाेल ढवळे यांनी केली.विविध कायदे पारीत करुन भांडवलदारांना पाठीशी घालून कामगार, कष्टकरी, शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर आणण्याचे काम माेदी सरकार करत आहे. या विराेधात सर्वांनीच लढा देण्यासाठी सज्ज झाले पाहीजे असे आवाहनही काॅ. ढवळे यांनी केले. हाथरस सारख्या घटनांनी माेदी सरकारची भूमिका काेणाच्या बाजूने आहे हे सिध्द हाेत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार सुभाष पाटील, आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, प्रितम म्हात्रे यांच्यासह अन्य मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.दरम्यान, केंद्राने पारीत केलेल्या कृषी आणि कामगार कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करु नका असे मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले.