शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

महायुती तुटल्यानेच राष्ट्रवादीची बाऊंड्री

By admin | Updated: October 27, 2014 00:39 IST

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती अस्तित्वात नव्हती म्हणूनच ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाज राखली गेली व तिचे चार आमदार तरी निवडून आलेत

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती अस्तित्वात नव्हती म्हणूनच ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाज राखली गेली व तिचे चार आमदार तरी निवडून आलेत. अन्यथा तेही आले नसते व मनसे, काँग्रेस, सपाप्रमाणेच राष्ट्रवादीही ठाणे जिल्ह्यातून तडीपार झाली असती.या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १८ जागांपैकी सात भाजपाला, सहा शिवसेनेला, चार राष्ट्रवादीला आणि एक अपक्षाला अशा जागा प्राप्त झाल्या आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदासंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. त्यांना ८१९७४ मते मिळालीत. आणि भाजपा व शिवसेना यांच्या उमेदवारांना १३३९१ व सनेच्या उमेदवाराला ३७२५९ अशी मते मिळालीत. हा एकच मतदारासंघ असा आहे की जिथे सेना-भाजपाच्या उमेदवारां पडलेल्या मतदानापेक्षा राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवाराला पडलेली मते दुपटीहून अधिक आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक यांचे पुत्र संदीप हे निवडणूक लढवित होते. या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला ४६४०५ तर सेनेच्या उमेदवाराला ६७७१९ अशी मते पडलीत. तर राष्ट्रवादीच्या संदीप नाईक ७६४४४ अशी मते मिळालीत. सेना, भाजपाच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तर ती संदीप नाईक यांच्या मतांपेक्षा दुपटीहून अधिक होते. असेच शहापुरात घडले तिथे राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांना ५६८१३ मते पडलीत. पण सेनेच्या उमेदवारला ५१२६९, भाजपाच्या उमेदवाराला १८२४६ मते पडलीत या दोघांचीही मते बरोरांपेक्षा खूप जास्त होतात. उल्हासनगरातही असेच चित्र आहे. तेथून विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींना ४३७६० मते पडलीत. परंतु, भाजपाच्या उमेदवाराला ४१८९७ सेनेच्या उमेदवाराला २३८६८ मते मिळालीत. दोघांच्या मतांची बेरीज ही खूपच अधिक होते. याचा अर्थ या वेळी सेना, भाजपा स्वतंत्र लढले म्हणून ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला किमान चारजागी तरी यश मिळाले, हे स्पष्ट होते. (विशेष प्रतिनिधी)