शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

महायुती तुटल्यानेच राष्ट्रवादीची बाऊंड्री

By admin | Updated: October 27, 2014 00:39 IST

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती अस्तित्वात नव्हती म्हणूनच ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाज राखली गेली व तिचे चार आमदार तरी निवडून आलेत

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती अस्तित्वात नव्हती म्हणूनच ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाज राखली गेली व तिचे चार आमदार तरी निवडून आलेत. अन्यथा तेही आले नसते व मनसे, काँग्रेस, सपाप्रमाणेच राष्ट्रवादीही ठाणे जिल्ह्यातून तडीपार झाली असती.या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १८ जागांपैकी सात भाजपाला, सहा शिवसेनेला, चार राष्ट्रवादीला आणि एक अपक्षाला अशा जागा प्राप्त झाल्या आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदासंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. त्यांना ८१९७४ मते मिळालीत. आणि भाजपा व शिवसेना यांच्या उमेदवारांना १३३९१ व सनेच्या उमेदवाराला ३७२५९ अशी मते मिळालीत. हा एकच मतदारासंघ असा आहे की जिथे सेना-भाजपाच्या उमेदवारां पडलेल्या मतदानापेक्षा राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवाराला पडलेली मते दुपटीहून अधिक आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक यांचे पुत्र संदीप हे निवडणूक लढवित होते. या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला ४६४०५ तर सेनेच्या उमेदवाराला ६७७१९ अशी मते पडलीत. तर राष्ट्रवादीच्या संदीप नाईक ७६४४४ अशी मते मिळालीत. सेना, भाजपाच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तर ती संदीप नाईक यांच्या मतांपेक्षा दुपटीहून अधिक होते. असेच शहापुरात घडले तिथे राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांना ५६८१३ मते पडलीत. पण सेनेच्या उमेदवारला ५१२६९, भाजपाच्या उमेदवाराला १८२४६ मते पडलीत या दोघांचीही मते बरोरांपेक्षा खूप जास्त होतात. उल्हासनगरातही असेच चित्र आहे. तेथून विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींना ४३७६० मते पडलीत. परंतु, भाजपाच्या उमेदवाराला ४१८९७ सेनेच्या उमेदवाराला २३८६८ मते मिळालीत. दोघांच्या मतांची बेरीज ही खूपच अधिक होते. याचा अर्थ या वेळी सेना, भाजपा स्वतंत्र लढले म्हणून ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला किमान चारजागी तरी यश मिळाले, हे स्पष्ट होते. (विशेष प्रतिनिधी)