शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वनदळीचा सातबारा आदिवासींच्या नावावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 02:07 IST

गेल्या अनेक वर्षांपासून जे आदिवासी बांधव वनजमिनी कसत होते, त्या जमिनीचा सातबारा आता त्यांच्या नावावर करण्यात आला आहे

पनवेल : गेल्या अनेक वर्षांपासून जे आदिवासी बांधव वनजमिनी कसत होते, त्या जमिनीचा सातबारा आता त्यांच्या नावावर करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील ५८० जणांना ३६ भूखंडांची सनद गुरुवारी पनवेल तहसील कार्यालयात वाटण्यात आली. त्यामुळे आता ही जमीन आदिवासींच्या मालकीची झाली आहे. त्यावरील अतिक्र मणाचा शिक्का पुसण्यात आला आहे.पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या आणि पाडे आहेत. अतिशय दुर्गम भागात राहून वनवासी कसाबसा उदरनिर्वाह करतात. कित्येकांनी हक्काची जागा नसल्याने ते वन जमीन कसत आहेत. त्या जमिनीत मशागत करून भाज्या पिकवल्या जात आहेत. काहींनी याच जमिनीवर राहण्याकरिता निवारा बांधला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनी हे कुटुंब कसत असतानाही वनविभागाकडून या जमिनी वर्ग करण्यात आल्या नव्हत्या. जमिनीच्या रेकॉर्डवर अतिक्र मणाचा शिक्का पडला असल्याने आदिवासींना शासकीय योजनेत भाग घेता येत नव्हता. त्याचबरोबर त्यांना लाभही मिळत नसल्याने हे कुटुंब उपेक्षित होते. या वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. तहसीलदार दीपक आकडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण कदम, तलाठी संदीप भंडारे, विशाल भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले. गेल्या सहा महिन्यापासून पुरावे जमा करण्याचे काम सुरू होते. हे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले. त्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी हिरवा कंदील दिला. त्याचबरोबर सर्व कागदपत्रे तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करून गुरुवारी आदिवासींना तहसीलदार दीपक आकडे यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार बी.टी. गोसावी, कल्याण कदम, उमेश पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. त्यामुळे आता या जमिनीवर आदिवासींचा कायद्याने हक्क लागू झाला आहे. त्यांना वन आणि इतर विभागाकडून त्रास होणार नाही. (वार्ताहर)