शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

ग्रामीण जनतेच्या न्यायासाठी उपाययोजना

By admin | Updated: January 19, 2016 02:15 IST

आजही सर्वसाधारण माणूस बदललेला नाही, त्यामुळे न्यायव्यवस्थेशिवाय पर्याय नाही. परंतु दुर्गम डोंगराळ भागात भौतिक सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील जनतेला

पोलादपूर : आजही सर्वसाधारण माणूस बदललेला नाही, त्यामुळे न्यायव्यवस्थेशिवाय पर्याय नाही. परंतु दुर्गम डोंगराळ भागात भौतिक सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रामुख्याने तळागाळातील गोरगरिबांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुखकारी व समृद्ध व्हावे म्हणून तालुक्याच्या ठिकाणी ग्रामन्यायालये सुरू करण्यात येत आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. रेखा सोंडूर बलदोटा यांनी पोलादपूर येथे महाड बार वकील असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामन्यायालयाचे उद्घाटन झाले.यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात तुटे वादविवाद, संवाद तो हितकारी, या समर्थांच्या ओवीचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, या ग्रामन्यायालयाच्या माध्यमातून तंटे बखेडे, वादविवाद हे सुसंवादाने सुटतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमप्रसंगी रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम मोडक, दिवाणी न्यायाधीश अविनाश क्षीरसागर, महाड बार असोसिएशन अ‍ॅड. उदय देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, आ. भरतशेठ गोगावले आदी उपस्थित होते.शारीरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या ग्रामन्यायालयांच्या माध्यमातून न्याय मिळणार असून दोन वर्षे शिक्षेपर्यंतचे दिवाणी व फौजदारी खटले चालविले जातील, अशी माहिती न्या. मोडक यांनी दिली.