शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

पोलादपूर येथे सर्वाधिक पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 03:56 IST

जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद पोलादपूर येथे १७६ मि.मी. झाली आहे. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद पोलादपूर येथे १७६ मि.मी. झाली आहे. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.श्रीवर्धन येथे १४२ मि.मी. पावसाची नोंद झाली, कर्जत ११७.२०, अलिबाग ११०, पेण ८२.२०, मुरु ड १३४, पनवेल ८२.४०, उरण ७०, खालापूर १०५, माणगाव १२०, रोहा ९३, सुधागड ९६.३३, तळा ९०, महाड १२१,म्हसळा १२३.२०, माथेरान १०३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २४ तासांतील जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ११०.३३ मि.मी. आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात आगामी ४८ तासांकरिता अतिवृष्टीचा इशारा बुधवारी दिला आहे. या कालावधीत समुद्रही खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्या. अतिवृष्टीला सामोरे जाण्यासाठी बचाव पथके, साहित्य, रुग्ण्वाहिका आदी सुविधा सज्ज ठेवाव्यात. नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावेत. सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रवाहाच्या मार्गातील अडथळे दूर करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात ०२१४१-२२२११८ / २२२०९७/ २२२३२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्तीकालीन कार्य कक्षातर्फे करण्यात आले आहे.