शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

खाणपट्ट्यांचा होणार मेकओव्हर

By admin | Updated: September 26, 2016 02:21 IST

नैसर्गिक साधन संपत्तीवर घाला घालून गौण खनिजाच्या उत्खननातून सरकारला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र यातून होणाऱ्या विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी सरकारने

आविष्कार देसाई,  अलिबागनैसर्गिक साधन संपत्तीवर घाला घालून गौण खनिजाच्या उत्खननातून सरकारला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र यातून होणाऱ्या विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये खनिज विकास प्रतिष्ठान स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रतिष्ठान स्वामित्वधनाच्या १० टक्के रक्कम अधिक आकारुन त्या निधीतून खाणपट्टा परिसराचा मेकओव्हर करणार आहे. रॉयल्टी भरलेली असताना देखील आणखीन कर कशाला असा दबका सूर काही खाणपट्टाधारकांनी लावला आहे. या योजनेमुळे रायगड जिल्ह्यात सुमारे १५ कोटी रुपयांची विकासकामे होण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जाते. खाणपट्ट्यातील नागरिकांच्या व्यथा सर्वप्रथम ‘लोकमत’ने मांडल्या होत्या. तेथील नागरिकांना सोयी-सुविधांसाठी वेगळ््या निधीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याने उरण तालुक्यात खाणपट्टा कामगारांसाठी काम करणाऱ्या सिध्दार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटना, आगरी समाज शेतकरी विकास प्रबोधिनी अशा संघटनांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची डेव्हलमेंट जिल्ह्यात होत आहे. विकासकामांसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा बळी दिला जातो. विकासकामांसाठी लागणारे दगड, माती, रेती, मुरुम, बॉक्साइट, तांबे, लोह असे विविध खनिज निसर्गाच्या कुशीतूनच घेतले जाते. यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये खाणपट्टे लिलावाने दिले जातात. यासाठी खाणपट्टेधारकांकडून स्वामित्व धनाच्या माध्यमातून ठरावीक रक्कम आकारण्यात यायची मात्र स्वामित्व धनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून त्या खाणपट्टा परिसराचा विकास साधणे शक्य नव्हते.खाणपट्टा विभागातील उत्खनन केल्यामुळे तेथील परिसराचे विद्रूपीकरण व्हायचे. तेथील रस्त्याची दैना उडायची त्याचप्रमाणे तेथील गावातील, वस्तीतील स्थानिकांना वेगवेगळ््या समस्येला तोंड द्यावे लागायचे. त्या परिसरात सोयी-सुविधा देण्यासाठी निधीची आवश्यकता होती. तसेच बेकायदा खाणपट्ट्यांमुळे सरकारचा दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत होता. हा आर्थिक फटका सहन करताना सरकारच्या नाकीनऊ आले होते. महसूल वाढविणे आणि बेकायदा खाणपट्ट्यांना अटकाव करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची होती.यावर उपाय म्हणून सरकारने प्रत्येक जिल्ह्यात खनिज विकास प्रतिष्ठान स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या परिसरात खाणपट्टे लिलावाने दिले आहेत त्यांच्यावरील स्वामित्वधनाच्या १० टक्के अधिक रक्कम प्रतिष्ठानला घेता येणार आहेत. या मिळालेल्या रकमेतून खाणबाधित विभागातील रस्ते, आरोग्य सुविधा, लाइट, पाणी, नाले असे विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळणार असल्याचे आगरी समाज शेतकरी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी सांगितले.२०१५-१६ या कालावधीत गौणखनिजाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला सुमारे १०७ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. त्यानुसार स्वामित्वधनाच्या १० टक्केप्रमाणे १० कोटी ७० लाख अधिक प्रशासनाला प्राप्त झाले असते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात यावर अंमलबजावणी होणार आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात गौणखनिजाचे उद्दिष्ट सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार असल्याने स्वामित्वधनाच्या १० टक्के मिळणारी रक्कम निश्चितच १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठानला त्या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही आणि तेथे वेगाने विकास होण्यातील अडथळा दूर होणार आहे.