शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

शेती कर्जासाठी रोकड उपलब्ध करावी

By admin | Updated: December 28, 2016 03:55 IST

शेतकरी खातेदाराला कर्ज वितरित करता यावे यासाठी नोटाबंदीनंतर नोटांची कमतरता असली तरी रायगड जिल्हा सहकारी बँकेला त्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणात भारतीय

अलिबाग : शेतकरी खातेदाराला कर्ज वितरित करता यावे यासाठी नोटाबंदीनंतर नोटांची कमतरता असली तरी रायगड जिल्हा सहकारी बँकेला त्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणात भारतीय स्टेट बँकेने रोकड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी मंगळवारी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या त्रैमासिक बैठकीत जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले बोलत होत्या. जिल्ह्यातील बँकांनी त्यांना दिलेले शेती पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे अशा सूचना देवून जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले पुढे म्हणाल्या की, पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ९३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आर्थिक वर्षाअखेरपर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. बँकेने कॅशलेस करण्यासाठी निवडलेल्या गावात ग्रामसभेला उपस्थित राहून कॅशलेस व्यवहारासंदर्भात जनतेमध्ये जागृती करण्याचे काम करावे. तसेच बँकेने स्वतंत्रपणे शिबिरे आयोजित करु न जनजागृती करावी, तरच कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जनतेकडून प्रतिसाद मिळेल व कॅशलेस गावे करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी के ल्या. या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक सी.कार्तिक, बँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीशकुमार सिंग, लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधुसूदन, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुधाकर रगतवान, रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नाबार्डने तयार केलेल्या संभाव्यतायुक्त ऋ ण योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)बँक खाती आधार कार्डाशी जोडा- निवृत्तिवेतनधारकांची बँक खाती आधार कार्डाशी जोडण्याचे काम येत्या १५ जानेवारी २०१७ पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावेत अशा सूचनाही जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिल्या. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावेत - राष्ट्रीयकृत बँकांनी ९३ टक्के, खाजगी बँकांनी ७४ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ६४ टक्के, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने ९२ टक्के असे सर्व बँकांनी मिळून ९१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असल्याची माहिती लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधुसूदन यांनी दिली.