शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अलिबागमध्ये बसला महाआघाडीला धक्का

By admin | Updated: October 26, 2016 05:25 IST

अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापला शह देण्यासाठी सर्वपक्षीयांच्या महाआघाडीमध्ये आम आदमी पार्टी (आप) सामील नाही. आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार

अलिबाग : अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापला शह देण्यासाठी सर्वपक्षीयांच्या महाआघाडीमध्ये आम आदमी पार्टी (आप) सामील नाही. आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार नसल्याचे आपचे कार्यकर्ते दिलीप जोग यांनी स्पष्ट केले. आपच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सर्वपक्षीय महाआघाडीला निवडणुकीआधीच चांगलाच धक्का बसल्याचे बोलले जाते.शेकापची राजवट उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची महाआघाडी झाली आहे. या आघाडीमध्ये मनसे, आप या सह अन्य पक्षांना सामावून घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमख दीपक रानवडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले होते. मात्र या महाआघाडीमध्ये आपने सामील नसल्याने महाआघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. आपने गेल्या दोन वर्षात सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर आवाज उठविला होता. रस्ते, पाणी आणि आरोग्य सेवा यावर विविध आंदोलने आपने केली होती. त्यामुळे आपची जनसामान्यांमध्ये चांगलीच ओळख झाली होती.अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापची एक हाती सत्ता आहे. विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याच नेतृत्वाखाली आताच्या निवडणुका लढण्याचे पक्षश्रेष्ठीने जाहीर केले आहे. प्रशांत नाईक यांची असलेली लोकप्रियता पाहूनच पक्षाने नाईक यांच्यावर पुन्हा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सोपवली आहे. त्यामुळे शेकापला टक्कर देणे कोणत्याही एका पक्षाला शक्य नाही. हे माहीत असल्यानेच काँग्रेस, शिवसेना, भाजपा या प्रमुख पक्षांनी महाआघाडीची मोट बांधली. त्यामध्ये छोट्या पक्ष्यांना सामावून त्यांना काही जागा देण्याचा फॉर्म्युला होता. मात्र आप या महाआडीत सामील होणार नसून कोणतीही जागा लढणार नसल्याचे आपचे दिलीप जोग यांनी स्पष्ट केले आहे. आपमुळे महाआघाडीला निवडणुकीपूर्वीच जबरदस्त धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वीच असा धक्का बसल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे शेकापची राजवट उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची महाआघाडी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आपमुळे धक्का बसल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाआघाडीला शेकापला नामोहरण करण्यासाठी आणखीन ठोस पावले उचलावी लागणार असल्याचे दिसून येते. आप महाआघाडीत सामील होणे न होणे हा त्यांचा निर्णय आहे. परंतु महाआघाडी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक रानवडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.