शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दिवाळीसाठी विशेष मुलांनी बनवल्या पणत्या

By admin | Updated: October 26, 2016 05:24 IST

निर्मात्याने आपल्या वाट्याला दिलेल्या जीवनास दोष न देता व्यावसायिक प्रशिक्षण घेवून, व्यक्तिगत जिद्दीतून अथक मेहनतीने आपल्या चिमुकल्या हातातून

- जयंत धुळप, अलिबागनिर्मात्याने आपल्या वाट्याला दिलेल्या जीवनास दोष न देता व्यावसायिक प्रशिक्षण घेवून, व्यक्तिगत जिद्दीतून अथक मेहनतीने आपल्या चिमुकल्या हातातून साकारलेल्या सहा हजार सौंदर्यपूर्ण पणत्यांमध्ये यंदाच्या दीपावलीत दीपज्योती उजळणार आहेत. या सुखद भावनेनेच या सहा हजार पणत्यांचे निर्माते पेण येथील आई डे केअर संस्थेतील विशेष मुले सध्या भारावून गेली आहेत.आई डे केअर संस्थेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी व्यावसायिक मार्गदर्शन घेऊ न संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या काळात छोटे व मोठे गणेश वाहक उंदरांच्या सुबक मूर्ती बनविल्यानंतर आता दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी पणत्या बनविण्याचे काम, या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊ न स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. आपल्या संस्थेच्या नवीन इमारतीच्या उभारणीत या माध्यमातून आर्थिक हातभार लावण्याची एक मानसिकता देखील या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. यावर्षी अवघ्या १५ ते २० दिवसांच्या अल्प कालावधीत या मुलांनी तब्बल सहा हजार पणत्या तयार केल्या. या पणत्या पेण बाजारात लक्ष्मी नारायण मंदिर, आलिशान सुपर मार्केट, अ‍ॅक्सीस बँक या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता अशा व्यावसायिक प्रशिक्षणातून संस्थेतील ११ मुले मानधन घेवून स्वत:च्या पायावर उभे राहिले असल्याची माहिती आई डे केअर संस्थेच्या कार्याध्यक्षा स्वाती मोहिते यांनी दिली.विशेष मुले आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या कारणाने दुसऱ्यावर अवलंबून असतात. या मुलांना विशेष शिक्षण देणे, त्यांना योग्य थेरेपी देणे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे, आई-वडिलांच्या पश्चात किंवा हयातीत त्यांची उत्तम प्रकारे देखभाल करणे, ही काळाची गरज ओळखून या संस्थेने या मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र १५ जून २०१६ रोजी पेण येथे सुरू केले असून, सद्यस्थितीत येथे ४२ विद्यार्थी व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. विशेष मुलांमध्ये अनेक प्रकारचे कलागुण दडलेले असतात. त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता या कलेला वाव देण्याचे काम आई डे केअर संस्थेच्या माध्यमातून कार्याध्यक्षा स्वाती मोहिते व त्यांचे सहकारी १३ शिक्षक व कर्मचारी हे करीत असून, या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या वस्तूंची जास्तीत जास्त खरेदी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.१५ ते २० दिवसांच्या अल्प कालावधीत या मुलांनी तब्बल सहा हजार पणत्या तयार केल्या. या पणत्या पेण बाजारात लक्ष्मी नारायण मंदिर, आलिशान सुपर मार्केट, अ‍ॅक्सीस बँक या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले आहे.