शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बोर्र्लीपंचतन बाजारपेठेत वीजवाहक तारांवर अडकले पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:44 IST

नागरिकांना धोका : संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी

दिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याला 'निसर्ग' चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्याने अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे कुठल्या कुठे उडून गेल्याने कित्येक कुटुंब उघड्यावर आले आहेत. याच पाश्र्वभूमीवर वादळातील अशीच एक उडालेली पत्र्याची शेड बोर्र्लीपंचतन बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर लोंबकळत असल्याने बाजारहाटासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक बनली आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळ ३ जून रोजी कोकण किनाºयावर दाखल झाले. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होऊन अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. या घटनेला आज आठ दिवस होत असताना बोर्लीकरांच्या डोक्यावर आणखी एक टांगती पत्र्याची शेड धोक्याची घंटा देत आहे. परिणामी अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शेड हटवण्याची मागणी येथील नागरिक सातत्याने करत आहेत. मात्र, याकडे संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.या वादळामध्ये तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसानीबाबत अघटित घटना ग्रामस्थांना संतापजनक ठरल्या आहेत. उलटसुलट वादळामुळे कोणती वस्तू कोणावर पडून मोठया प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या पत्र्याच्या शेडमुळे अशा घटनेची पुनरावृत्ती होऊन दुर्घटना घडू नये. त्यामुळे या लोंबकळणाºया धोकादायक पत्रा शेडला कोण हटवणार ? कोण पुढाकार घेणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे.