शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मुरुडमध्ये ‘सागरी सुरक्षा कवच’ अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:32 IST

पोलीस सज्ज; शिघ्रे चेक पोस्ट, आगरदांडा, राजपुरी, काशीद, मुरुड किनाऱ्यावर बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क आगरदांडा : सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम काबंळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सागर कवच अभियानाला’ सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली.मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. यंत्रणामधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारित या ऑपरेशनमध्ये नौदल, कोस्ट-गार्ड, मेरीटाइम बोर्ड, यांचा सहभाग होता.मुरूड पोलीस ठाण्याकडून सागरी हद्दीत गस्त करण्याकरिता सागरी सुरक्षा शाखेचे ६ अधिकारी, ५६ अंमलदार, या अभियानात सहभागी झाले होते.पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी तपासणी व टेहळणी केली जाते. यामध्ये शिघ्रे चेक पोस्ट, आगरदांडा, राजपुरी, काशीद, मुरूड आदी ठिकाणांसह समुद्र किनाऱ्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

लाभदायक अभियान वाहनांची तपासणी करून त्याची नोंद घेणे सागरी मच्छीमारीमधील बोटी तपासून परवाने व कागदपत्राची माहिती घेऊन नौका आपल्याच भागातील आहे किंवा कसे याची खात्री करून घेणे. वाहनांच्या तपासणीद्वारे सजगता बाळगून अतिरेकी कार्यवाही अथवा स्फोटक गती विधेयकाला रोखणे अशा गोष्टी रोखण्यासाठी लाभदायक. 

सागरी किऱ्यावरील मच्छीमारांना संशयस्पद बोट आढळून आल्यास अथवा वाहनातून गैर वाहतूक अथवा देश विघातक कार्यवाहीची संशय येताच तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. सागरी सुरक्षा महत्त्वाची असून नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.   -परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, मुरूड

टॅग्स :Raigadरायगड