शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये ‘सागरी सुरक्षा कवच’ अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:32 IST

पोलीस सज्ज; शिघ्रे चेक पोस्ट, आगरदांडा, राजपुरी, काशीद, मुरुड किनाऱ्यावर बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क आगरदांडा : सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम काबंळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सागर कवच अभियानाला’ सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली.मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. यंत्रणामधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारित या ऑपरेशनमध्ये नौदल, कोस्ट-गार्ड, मेरीटाइम बोर्ड, यांचा सहभाग होता.मुरूड पोलीस ठाण्याकडून सागरी हद्दीत गस्त करण्याकरिता सागरी सुरक्षा शाखेचे ६ अधिकारी, ५६ अंमलदार, या अभियानात सहभागी झाले होते.पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी तपासणी व टेहळणी केली जाते. यामध्ये शिघ्रे चेक पोस्ट, आगरदांडा, राजपुरी, काशीद, मुरूड आदी ठिकाणांसह समुद्र किनाऱ्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

लाभदायक अभियान वाहनांची तपासणी करून त्याची नोंद घेणे सागरी मच्छीमारीमधील बोटी तपासून परवाने व कागदपत्राची माहिती घेऊन नौका आपल्याच भागातील आहे किंवा कसे याची खात्री करून घेणे. वाहनांच्या तपासणीद्वारे सजगता बाळगून अतिरेकी कार्यवाही अथवा स्फोटक गती विधेयकाला रोखणे अशा गोष्टी रोखण्यासाठी लाभदायक. 

सागरी किऱ्यावरील मच्छीमारांना संशयस्पद बोट आढळून आल्यास अथवा वाहनातून गैर वाहतूक अथवा देश विघातक कार्यवाहीची संशय येताच तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. सागरी सुरक्षा महत्त्वाची असून नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.   -परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, मुरूड

टॅग्स :Raigadरायगड