शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मुरुडमध्ये ‘सागरी सुरक्षा कवच’ अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:32 IST

पोलीस सज्ज; शिघ्रे चेक पोस्ट, आगरदांडा, राजपुरी, काशीद, मुरुड किनाऱ्यावर बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क आगरदांडा : सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम काबंळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सागर कवच अभियानाला’ सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली.मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. यंत्रणामधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारित या ऑपरेशनमध्ये नौदल, कोस्ट-गार्ड, मेरीटाइम बोर्ड, यांचा सहभाग होता.मुरूड पोलीस ठाण्याकडून सागरी हद्दीत गस्त करण्याकरिता सागरी सुरक्षा शाखेचे ६ अधिकारी, ५६ अंमलदार, या अभियानात सहभागी झाले होते.पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी तपासणी व टेहळणी केली जाते. यामध्ये शिघ्रे चेक पोस्ट, आगरदांडा, राजपुरी, काशीद, मुरूड आदी ठिकाणांसह समुद्र किनाऱ्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

लाभदायक अभियान वाहनांची तपासणी करून त्याची नोंद घेणे सागरी मच्छीमारीमधील बोटी तपासून परवाने व कागदपत्राची माहिती घेऊन नौका आपल्याच भागातील आहे किंवा कसे याची खात्री करून घेणे. वाहनांच्या तपासणीद्वारे सजगता बाळगून अतिरेकी कार्यवाही अथवा स्फोटक गती विधेयकाला रोखणे अशा गोष्टी रोखण्यासाठी लाभदायक. 

सागरी किऱ्यावरील मच्छीमारांना संशयस्पद बोट आढळून आल्यास अथवा वाहनातून गैर वाहतूक अथवा देश विघातक कार्यवाहीची संशय येताच तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. सागरी सुरक्षा महत्त्वाची असून नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.   -परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, मुरूड

टॅग्स :Raigadरायगड