शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

खालापूर तहसीलकडून माहिती अधिकार अर्जाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:52 IST

शेतकरी हवालदिल : कागदपत्र मिळत नसल्याने निराशा

मोहोपाडा : आठ महिने उलटूनसुद्धा तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकारात मागितलेली कागदपत्रे मिळत नसल्याने खालापुरातील माजगावचे शेतकरी निराश झाले आहेत. दलालांसाठी धावपळ करून कागदपत्रे लगेच गोळा होतात. मात्र, शेतकरी वाऱ्यावर अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

खालापूर तालुक्यातील माजगाव येथील जवळपास ५० शेतकऱ्यांची १५० एकर जमीन ३० वर्षांपूर्वी औद्योगिक कारणासाठी धनिकांनी खरेदी केली होती. जागा विकसित करण्यास सुरुवात झाल्यास सर्वांना रोजगार देऊ, या आश्वासनामुळे शेतकरी आशेवर होते; परंतु जागा विकसित करणे दूरच. जागेची परस्पर विक्री सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. जमीन नाही आणि रोजगारदेखील नसल्याने भूमिहीन शेतकºयांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. जानेवारी २००७ मध्ये तोडगा काढण्यासाठी खालापूर तहसील कार्यालयात शेतकरी आणि खरेदीदार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बैठकीत तहसीलदारांच्या समोर जागा मालकाने शेतकºयांना जागा विकसित करताना रोजगार देऊ, असा शब्द दिला असल्याचे शेतकरी जयवंत पाटील यांनी सांगितले. तसेच बैठकीत इतिवृत्तातदेखील या चर्चेची नोंद करण्यात आली होती. परंतु त्यानंतरसुद्धा जागेची अनिवासी भारतीयांना प्रचंड किंमत घेऊन विक्री होत असल्याने शेतकºयांना न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. न्यायालयीन कामकाजात तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत महत्त्वाची असल्याने शेतकरी जयवंत पाटील यांनी जुलै २०१९मध्ये माहिती अधिकारात या इतिवृत्ताची प्रत मिळावी, अशी मागणी केली. परंतु आठ महिने उलटूनसुद्धा खालापूर तहसील कार्यालयातून इतिवृत्ताची प्रत मिळालेली नाही. वारंवार चकरा मारूनसुद्धा सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी हताश आहेत.२००७ मधील इतिवृत्त सापडत नाही असे तहसील कार्यालयातून सांगण्यात येत आहे. १९९२चा बिनशेती विक्रीचा पेपर कर्जत प्रांतमधून मला अवघ्या १५ मिनिटांत मिळाला. त्यामुळे खालापूर तहसील जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे असे वाटते.- जयवंत पाटील,शेतकरी, माजगावमी कर्मचाºयांना सदरचे इतिवृत्त शोधून द्या, असे आदेश दिले आहेत. गरज पडल्यास दोन कर्मचारी जास्त घ्या, असेदेखील स्टोअरकिपरला सांगितले आहे.- इरेश चप्पलवार,तहसीलदार,खालापूर

टॅग्स :Raigadरायगड