शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खालापूर तहसीलकडून माहिती अधिकार अर्जाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:52 IST

शेतकरी हवालदिल : कागदपत्र मिळत नसल्याने निराशा

मोहोपाडा : आठ महिने उलटूनसुद्धा तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकारात मागितलेली कागदपत्रे मिळत नसल्याने खालापुरातील माजगावचे शेतकरी निराश झाले आहेत. दलालांसाठी धावपळ करून कागदपत्रे लगेच गोळा होतात. मात्र, शेतकरी वाऱ्यावर अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

खालापूर तालुक्यातील माजगाव येथील जवळपास ५० शेतकऱ्यांची १५० एकर जमीन ३० वर्षांपूर्वी औद्योगिक कारणासाठी धनिकांनी खरेदी केली होती. जागा विकसित करण्यास सुरुवात झाल्यास सर्वांना रोजगार देऊ, या आश्वासनामुळे शेतकरी आशेवर होते; परंतु जागा विकसित करणे दूरच. जागेची परस्पर विक्री सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. जमीन नाही आणि रोजगारदेखील नसल्याने भूमिहीन शेतकºयांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. जानेवारी २००७ मध्ये तोडगा काढण्यासाठी खालापूर तहसील कार्यालयात शेतकरी आणि खरेदीदार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बैठकीत तहसीलदारांच्या समोर जागा मालकाने शेतकºयांना जागा विकसित करताना रोजगार देऊ, असा शब्द दिला असल्याचे शेतकरी जयवंत पाटील यांनी सांगितले. तसेच बैठकीत इतिवृत्तातदेखील या चर्चेची नोंद करण्यात आली होती. परंतु त्यानंतरसुद्धा जागेची अनिवासी भारतीयांना प्रचंड किंमत घेऊन विक्री होत असल्याने शेतकºयांना न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. न्यायालयीन कामकाजात तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत महत्त्वाची असल्याने शेतकरी जयवंत पाटील यांनी जुलै २०१९मध्ये माहिती अधिकारात या इतिवृत्ताची प्रत मिळावी, अशी मागणी केली. परंतु आठ महिने उलटूनसुद्धा खालापूर तहसील कार्यालयातून इतिवृत्ताची प्रत मिळालेली नाही. वारंवार चकरा मारूनसुद्धा सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी हताश आहेत.२००७ मधील इतिवृत्त सापडत नाही असे तहसील कार्यालयातून सांगण्यात येत आहे. १९९२चा बिनशेती विक्रीचा पेपर कर्जत प्रांतमधून मला अवघ्या १५ मिनिटांत मिळाला. त्यामुळे खालापूर तहसील जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे असे वाटते.- जयवंत पाटील,शेतकरी, माजगावमी कर्मचाºयांना सदरचे इतिवृत्त शोधून द्या, असे आदेश दिले आहेत. गरज पडल्यास दोन कर्मचारी जास्त घ्या, असेदेखील स्टोअरकिपरला सांगितले आहे.- इरेश चप्पलवार,तहसीलदार,खालापूर

टॅग्स :Raigadरायगड