शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जेएसडब्ल्यूची वाहिनी शेतकऱ्याच्या जागेतून

By admin | Updated: January 11, 2016 02:03 IST

जेएसडब्ल्यू कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चार गुंठे जमिनीतून जलवाहिनी टाकली असल्याचा आरोप येथील शेतकरी रफीक अधिकारी आणि त्यांचे बंधू असिफ अधिकारी यांनी केला

नागोठणे : जेएसडब्ल्यू कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चार गुंठे जमिनीतून जलवाहिनी टाकली असल्याचा आरोप येथील शेतकरी रफीक अधिकारी आणि त्यांचे बंधू असिफ अधिकारी यांनी केला असून त्यामुळे उर्वरित जागेचे मूल्य शून्य झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अरु ण शिर्केयांनी ही जलवाहिनी कोणाच्याही खाजगी जागेतून न नेता महामार्गाच्या जागेतूनच ती टाकण्यात आली असल्याचे सांगितले. येथील के.टी. बंधारा, पाटणसई ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी-वडखळ अशी नव्याने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. याच मार्गात रफीक अ. वहाब अधिकारी यांची चिकणी गावाचे हद्दीत सर्वे नं. गट १५३ क्षेत्र ००- ७३- ०३ हे. आर अशी मालकीची जमीन आहे. या जागेपैकी २ हजार ५७० चौ. मीटर जागा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केली गेली आहे व उर्वरित जागा अद्यापि अधिकारी यांच्या खुद्द मालकीची राहिली आहे.महामार्गाच्या शेजारून सध्या जेएसडब्ल्यूकडून जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. महामार्गालगत असलेल्या आमच्या जागेतून आमची परवानगी तसेच मोबदला न देता कंपनीने जलवाहिनी टाकली असल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे. कंपनीकडे यापूर्वी जाब विचारला असता, त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याचे असिफ अधिकारी म्हणाले. जमिनीचे मालक असलेले माझे बंधू रफीक अधिकारी नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात असल्यामुळे त्याचा फायदा कंपनीने घेत अनधिकृतपणे या जागेत जलवाहिनी टाकण्याचा पराक्र म केला असल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे. कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याकडून संबंधित मिळकतीचे भूसंपादन केलेले नाही व कोणतीही नोटीस दिली नसून कंपनी फायद्यासाठी जलवाहिनी टाकत आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)