शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

जेएसडब्ल्यूची वाहिनी शेतकऱ्याच्या जागेतून

By admin | Updated: January 11, 2016 02:03 IST

जेएसडब्ल्यू कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चार गुंठे जमिनीतून जलवाहिनी टाकली असल्याचा आरोप येथील शेतकरी रफीक अधिकारी आणि त्यांचे बंधू असिफ अधिकारी यांनी केला

नागोठणे : जेएसडब्ल्यू कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चार गुंठे जमिनीतून जलवाहिनी टाकली असल्याचा आरोप येथील शेतकरी रफीक अधिकारी आणि त्यांचे बंधू असिफ अधिकारी यांनी केला असून त्यामुळे उर्वरित जागेचे मूल्य शून्य झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अरु ण शिर्केयांनी ही जलवाहिनी कोणाच्याही खाजगी जागेतून न नेता महामार्गाच्या जागेतूनच ती टाकण्यात आली असल्याचे सांगितले. येथील के.टी. बंधारा, पाटणसई ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी-वडखळ अशी नव्याने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. याच मार्गात रफीक अ. वहाब अधिकारी यांची चिकणी गावाचे हद्दीत सर्वे नं. गट १५३ क्षेत्र ००- ७३- ०३ हे. आर अशी मालकीची जमीन आहे. या जागेपैकी २ हजार ५७० चौ. मीटर जागा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केली गेली आहे व उर्वरित जागा अद्यापि अधिकारी यांच्या खुद्द मालकीची राहिली आहे.महामार्गाच्या शेजारून सध्या जेएसडब्ल्यूकडून जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. महामार्गालगत असलेल्या आमच्या जागेतून आमची परवानगी तसेच मोबदला न देता कंपनीने जलवाहिनी टाकली असल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे. कंपनीकडे यापूर्वी जाब विचारला असता, त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याचे असिफ अधिकारी म्हणाले. जमिनीचे मालक असलेले माझे बंधू रफीक अधिकारी नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात असल्यामुळे त्याचा फायदा कंपनीने घेत अनधिकृतपणे या जागेत जलवाहिनी टाकण्याचा पराक्र म केला असल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे. कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याकडून संबंधित मिळकतीचे भूसंपादन केलेले नाही व कोणतीही नोटीस दिली नसून कंपनी फायद्यासाठी जलवाहिनी टाकत आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)