शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

अपंगत्वावर मात करीत जपला व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 00:21 IST

तांबे, पितळीची भांडी बनविण्याची कला

श्रीकांत नांदगावकर

तळा : वयाच्या सहाव्या वर्षांपासून आलेल्या अपंगत्वावर मात करीत गणेश(बाबा) रामचंद्र वडके निरक्षर न राहता प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत पूर्ण केले. नोकरी करणे शक्य नसल्याने त्यांनी वडिलोपार्जित तांबे, पितळीची भांडी बनविणे, भांड्याला कलई, पत्रा, डबे, दिवे बनविण्याची कला अंगीकारून वडिलांना मदत करू लागले. कालांतराने वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पश्चात गणेश वडके यांनी भांड्यांचा व्यवसाय पुढे चालू ठेवला; मात्र आधुनिक काळाच्या ओघात हा व्यवसाय बंद पडत गेला. वाढती महागाई तांबा-पितळ धातूचे वाढते दर, मजुरी यामुळे अनेक प्रकारचे भांडी बनविण्याचे कारखाने बंद पडले. मात्र, गणेश वडके यांनी जिद्दीने आत्मविश्वासाने अपंगत्वाचा न्यूनगंड न बाळगता तेवढ्याच हिमतीने बंद पडलेल्या व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यास सुरुवात केली आहे.

महाड, रोहा-अष्टमी, नागोठणे, पेण या मोठ्या शहरांमध्येदेखील भांड्यांचा व्यवसाय बंद पडल्याने येथील व्यापाऱ्यांनी इतर व्यवसाय पत्करला आहे. तर काहींंनी नोकरी पत्करली आहे हे वास्तव आहे. त्यामुळे भांड्याला कल्हई लावणे दुरापास्त झाले आहे. मात्र, आता याच व्यवसायाला आयुर्वेदात तांबा पितळ आरोग्यासाठी किती महत्त्व आहे हे पुन्हा समजू लागल्याने काहीजण घरात तांबा, पितळेची भांडी वापरू लागलो आहेत, तर लग्नकार्यात मुलीला आंदणात देण्यासाठी परात, तांब्या भांडे, समई, हंडा, कळशी, आदी वस्तू दिल्याशिवाय रुखवत पूर्ण होत नाही. हे समजून गणेश वडके यांनी जिद्दीने बंद पडलेल्या व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यास सुरुवात केली आहे. 

n साधी राहणी गावखेड्यातील, शहरातील ओळख असल्याने आताच्या परिस्थितीत व्यवसाय सुरू केला असून, त्यांचा उदरनिर्वाह आज त्याच व्यवसायावर सुरू आहे. रोज कासार आळीत हातोडा वाजायला लागल्याने कासारआळी असल्याचे जाणवू लागले आहे. त्यामुळे गणेश ऊर्फ बाबा यांच्याकडे कौतुकाने पाहिले जात आहे. 

टॅग्स :Raigadरायगड