शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

परवान्याअभावी हातपाटी ठप्प

By admin | Updated: August 24, 2015 02:37 IST

राज्य शासनाने पर्यावरण रक्षणाचे जतन करून नदी, खाड्यांमधील डुबी हातपाटीद्वारे रेती उत्खनन करणाऱ्या पारंपरिक रेती व्यावसायिकांना परवाने

पेण : राज्य शासनाने पर्यावरण रक्षणाचे जतन करून नदी, खाड्यांमधील डुबी हातपाटीद्वारे रेती उत्खनन करणाऱ्या पारंपरिक रेती व्यावसायिकांना परवाने देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. संबंधित पारंपरिक हातपाटी डुबी रेती व्यावसायिकांनी याबाबतीचे अर्ज महसूल विभागाकडे भरून देखील या हातपाटी व्यावसायिकांची रॉयल्टी व संबंधित परवाने महसूल यंत्रणेने न दिल्याने हातपाटी रेती व्यवसाय ठप्प झाला आहे.सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बाजारात रेतीअभावी बांधकामे ठप्प झाली असून याचा फटका मजूर, नाका कामगार व हातपाटी रेती व्यावसायिकांना बसत असून आर्थिक समस्येचा सामना त्यांना करावा लागत आहे. या व्यवसायावर अनेकांचा उदरनिर्वाह होत असून शासनाने हातपाटी डुबी रेती व्यवसायिकांना तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी रावे गावचे समाजसेवी कार्यकर्ते गुलाबचंद पाटील यांनी केली आहे.पेण तालुक्यातील दादर-रावे या खाडीकिनारी गावांमध्ये २०० ते २५० डुबी हातपाटी रेती व्यावसायिक असून पूर्वापार हातपाटीद्वारे रेती व्यवसाय करीत आहेत. गेले वर्षभर शासनाने रेती व्यवसायावर बंदी घातल्याने २००० ते २५०० कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. कामगारांना प्रतीक्षा कामाची : रेती व्यावसायिकांनी महसूल यंत्रणेकडे परवानगीबाबत अर्ज भरून देखील उत्खनन परवानगी व रॉयल्टी कर रक्कम भरून न घेतल्याने ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांधकामला रेती न मिळाल्याने हा व्यवसाय करणारे परवान्याअभावी रेती उत्खनन करू शकत नाहीत. यामुळे बांधकाम मजूर, नाका कामगार यांचा रोजगार बंद झाला आहे. पेणमध्ये २००० ते २५०० कामगार नाक्यावर मजुरीच्या प्रतीक्षेत उभे असतात. दासगाव : महिनाभरापूर्वी शासनाकडून वाळू व्यवसायाला रीतसर परवानगी मिळाली, परंतु या परवानगीनंतर हातपाटी व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने नियमात अनेक अडचणी आणल्यामुळे हा व्यवसाय अद्याप सुरू झाला नाही. मेरीटाइम बोर्डाची परवानगी, पर्यावरण खात्याची परवानगी व इतर अनेक छोट्या-मोठ्या परवानग्या असल्याने परवानग्या घेऊन देखील हा व्यवसाय सुरू होऊ शकला नाही. कारण या सर्व परवानग्या मिळून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होऊन रीतसर पैसे भरत रॉयल्टी मिळणे गरजेचे आहे. शासनाने पुन्हा वाळूचोरीवर लगाम लावण्यासाठी स्मार्ट प्रणाली आॅनलाइन एंट्री कायद्याला सुरुवात केल्यामुळे वाळू व्यावसायिकांना याचे प्रशिक्षण दिल्याशिवाय उत्खननाला परवानगी देण्यात येणार नाही. यामुळे हातपाटी व्यवसाय करणाऱ्या या मजुरांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे.(वार्ताहर)