शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णांच्या संख्येत वाढ; वृद्धांची संख्याही लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 00:00 IST

रायगडमध्ये तीन वर्षांत स्किझोफ्रेनियाचे दोन हजार २९७ रुग्ण

निखिल म्हात्रे अलिबाग : नैराश्य आणि तुटत चाललेल्या संवादामुळे गेल्या तीन वर्षांपासून स्किझोफ्रेनियाचे दोन हजार २९७ रुग्ण उपचारासाठी रायगड जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील रुग्णांची संख्या सर्वात जास्त असल्याचे मनोरुग्ण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. या रुग्णांत वृद्धांची संख्याही लक्षणीय आहे.गेल्या काही वर्षांपासून यातील स्किझोफ्रेनिया या आजाराच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. १ एप्रिल, २०१७ ते ३१ मार्च, २०१८ या कालावधीत १ हजार ४४ रुग्णांनी, तर १ एप्रिल, २०१८ ते ३१ मार्च, २०१९ या कालावधीत १ हजार ६५ रुग्ण उपचारासाठी मनोरुग्णालयात आल्याची नोंद आहे, तर या वर्षी १ एप्रिल, २०१९ ते ३१ मे, २०१९ या कालावधीत १८८ एवढे रुग्ण आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गेल्या तीन वर्षा$ंत २ हजार २९७ इतके रुग्ण उपचारासाठी आले असून, यात पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे, तर रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. नैराश्य, अश्लील चित्रफिती पाहणे, तुटत चाललेले संवाद, यामुळे हे आजार बळावत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आजारातील केवळ २० टक्के रुग्ण पूर्णत: बरे होत असल्याचेही डॉक्टर म्हणाले.काय आहे स्किझोफ्रेनिया आजार? : स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून, मेंदूचा विकारही आहे. मेंदूमधील डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. जनुकांमधील बदल, तसेच गर्भवती महिलेला ताप अथवा कुपोषित असल्यास बाळाला हा स्किझोफ्रेनिया आजार होण्याची जास्त शक्यता असते. स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांना विचार, भावना आणि वागणूक यात दोष निर्माण होतो. या आजारामध्ये व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो आणि तो माणूस स्वत: भ्रामक आणि आभासी जगामध्ये जगायला लागतात. रुग्णाचा मनावरील ताबा सुटतो. आजाराच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर उपचार करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागामार्फत रुग्णांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रुग्णालयात तरुणांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. - डॉ. अमोल भुसारे, मानसोपचार तज्ज्ञ, रायगड जिल्हा रुग्णालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटल