शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णांच्या संख्येत वाढ; वृद्धांची संख्याही लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 00:00 IST

रायगडमध्ये तीन वर्षांत स्किझोफ्रेनियाचे दोन हजार २९७ रुग्ण

निखिल म्हात्रे अलिबाग : नैराश्य आणि तुटत चाललेल्या संवादामुळे गेल्या तीन वर्षांपासून स्किझोफ्रेनियाचे दोन हजार २९७ रुग्ण उपचारासाठी रायगड जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील रुग्णांची संख्या सर्वात जास्त असल्याचे मनोरुग्ण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. या रुग्णांत वृद्धांची संख्याही लक्षणीय आहे.गेल्या काही वर्षांपासून यातील स्किझोफ्रेनिया या आजाराच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. १ एप्रिल, २०१७ ते ३१ मार्च, २०१८ या कालावधीत १ हजार ४४ रुग्णांनी, तर १ एप्रिल, २०१८ ते ३१ मार्च, २०१९ या कालावधीत १ हजार ६५ रुग्ण उपचारासाठी मनोरुग्णालयात आल्याची नोंद आहे, तर या वर्षी १ एप्रिल, २०१९ ते ३१ मे, २०१९ या कालावधीत १८८ एवढे रुग्ण आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गेल्या तीन वर्षा$ंत २ हजार २९७ इतके रुग्ण उपचारासाठी आले असून, यात पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे, तर रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. नैराश्य, अश्लील चित्रफिती पाहणे, तुटत चाललेले संवाद, यामुळे हे आजार बळावत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आजारातील केवळ २० टक्के रुग्ण पूर्णत: बरे होत असल्याचेही डॉक्टर म्हणाले.काय आहे स्किझोफ्रेनिया आजार? : स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून, मेंदूचा विकारही आहे. मेंदूमधील डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. जनुकांमधील बदल, तसेच गर्भवती महिलेला ताप अथवा कुपोषित असल्यास बाळाला हा स्किझोफ्रेनिया आजार होण्याची जास्त शक्यता असते. स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांना विचार, भावना आणि वागणूक यात दोष निर्माण होतो. या आजारामध्ये व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो आणि तो माणूस स्वत: भ्रामक आणि आभासी जगामध्ये जगायला लागतात. रुग्णाचा मनावरील ताबा सुटतो. आजाराच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर उपचार करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागामार्फत रुग्णांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रुग्णालयात तरुणांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. - डॉ. अमोल भुसारे, मानसोपचार तज्ज्ञ, रायगड जिल्हा रुग्णालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटल