शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

भूमिपूजनाऐवजी परदेश दौऱ्याला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2015 01:58 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी इंदू मिल येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परदेश दौरा जास्त महत्त्वाचा वाटतो,

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी इंदू मिल येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परदेश दौरा जास्त महत्त्वाचा वाटतो, असा आरोप करीत मुंबई काँग्रेसने मोदी-फडणवीसांच्या निषेधार्थ आंदोलन केले. या वेळी इंदू मिल येथे प्रतीकात्मक भूमिपूजन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदू मिल येथे प्रतीकात्मक भूमिपूजन आणि आंदोलन केले. काँग्रेसने या स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. आज आंबेडकर जयंती असल्याने भूमिपूजन करण्याची गरज होती. मात्र सरकारला या प्रश्नाचे सोयरसुतक नसल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री परदेश दौऱ्यात मश्गुल आहेत. सरकारने लवकरात लवकर स्मारकाचे भूमिपूजन करावे. केंद्र व राज्य सरकार आंबेडकर स्मारकाबाबत जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी राज्य शासनातर्फे कोणताही महत्त्वाचा मंत्री, भाजपा-शिवसेनेचा महत्त्वाचा नेता चैत्यभूमीकडे फिरकला नाही. बाबासाहेबांची जयंती देशात मोठ्या प्रमाणावर साजरी करायला हवी, असे निरुपम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हे श्रेयाचे राजकारण - रामदास आठवलेच्डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे अधिकृत भूमिपूजन काँग्रेसकडून व्हायला हवे होते. मात्र, इंदू मिलची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात वेळकाढूपणा केल्याने आज काँग्रेसवर प्रतीकात्मक भूमिपूजन करण्याची वेळ आल्याची बोचरी टीका रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केली. हे प्रतीकात्मक भूमिपूजन नव्हे, तर श्रेयाचे राजकारण असल्याचेही आठवले म्हणाले. च्इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी हस्तांतरित करण्याच्या निर्णयाबाबत आठवलेंनी आपल्या समर्थकांसह आज चैत्यभूमी ते इंदू मिलदरम्यान विजयी मिरवणूक काढली. इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाचे येत्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व्हायला हवे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. च्या वेळी आठवले यांनी काँग्रेसच्या आंदोलनावरही निशाणा साधला. काँग्रेसने या स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यामध्ये टाळाटाळ केली; आणि आता प्रतीकात्मक भूमीपूजन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. च्काँग्रेसने नेहमी दलितांच्या मतांचा वापर केला मात्र त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे आगामी काळात त्यांना दलितांची मते मिळणार नाहीत, असा दावा आठवले यांनी केला. चैत्यभूमीसमोरील समुद्रात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची मागणीही त्यांनी केली.