शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

पनवेल तालुक्यातील कर्नाळाच्या माथ्यावर सुरक्षेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:43 IST

स्वयंसेवकच नाहीत : गडावर जाण्याच्या मार्गावरील निवारा शेडचीही दुरवस्था

नामदेव मोरेनवी मुंबई : वनविभागाने कर्नाळा किल्ला पर्यटकांसाठी खुला केला असून, भेट देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. परंतु गडाच्या माथ्यावर सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना नसून स्वयंसेवकही नेमण्यात आलेले नाहीत. गडावर जाण्याच्या मार्गावरील निवारा शेडचीही वादळामध्ये दुरवस्था झाली असून, ते पुन्हा बांधण्याची मागणी केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या किल्ल्यांमध्ये कर्नाळाचा समावेश आहे. अभयारण्य व गडाला प्रत्येक वर्षी ८० हजार ते १ लाख नागरिक भेट देत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील निसर्ग भटकंतीसाठी सर्वांत आवडते ठिकाण म्हणूनही कर्नाळा प्रसिद्ध आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून हे ठिकाणही बंद केले होते. वनविभागाने १२ नोव्हेंबरला किल्ला पर्यटकांसाठी खुला केला आहे. भेट देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. या परिसराची देखभाल करण्यासाठी संयुक्त वनसमिती स्थापन करण्यात आली आहे. पर्यटकांकडून शुल्कही घेतले जात आहे. परंतु त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. गडावर जाताना यापूर्वी उभारण्यात आलेल्या निवारा शेडची वादळामध्ये दुरवस्था झाली आहे. पत्रे पडले आहेत. यामुळे डोंगर चढणाऱ्या नागरिकांना विश्रांतीसाठी जागाच उपलब्ध नाही. हे शेड पुन्हा तत्काळ उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

गडाच्या माथ्यावर मुख्य बालेकिल्ल्याच्या परिसरात स्वयंसेवक नेमण्याची आवश्यकता आहे. रविवारी तीन वाजण्याच्या सुमारास सुळक्यावरील मधमाश्या अचानक उठल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होेते. अशा प्रसंगात नक्की काय करायचे हे सांगण्यासाठी एकही स्वयंसेवक उपलब्ध नव्हता. माश्या पर्यटकांना चावल्या असत्या तर काय केले असते, असा प्रश्न उपस्थित होतो. 

आवश्यक उपाययोजनांची गरजn कर्नाळा किल्ला व अभयारण्य परिसरात मागील काही वर्षांत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी अनेक बदल केले आहेत. माहिती फलक सर्व ठिकाणी लावले आहेत. गडाचा इतिहास, आढळणारे पक्षी, मुलांसाठी खेळणी व इतर अनेक बदल केले आहेत. याच पद्धतीने गडावर स्वयंसेवक नेमण्यात यावेत व निवारा शेडचीही दुरुस्ती करून घ्यावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

आवश्यक उपाययोजनांची गरजकर्नाळा किल्ला व अभयारण्य परिसरात मागील काही वर्षांत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी अनेक बदल केले आहेत. माहिती फलक सर्व ठिकाणी लावले आहेत. गडाचा इतिहास, आढळणारे पक्षी, मुलांसाठी खेळणी व इतर अनेक बदल केले आहेत. याच पद्धतीने गडावर स्वयंसेवक नेमण्यात यावेत व निवारा शेडचीही दुरुस्ती करून घ्यावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल