शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पनवेल तालुक्यातील कर्नाळाच्या माथ्यावर सुरक्षेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:43 IST

स्वयंसेवकच नाहीत : गडावर जाण्याच्या मार्गावरील निवारा शेडचीही दुरवस्था

नामदेव मोरेनवी मुंबई : वनविभागाने कर्नाळा किल्ला पर्यटकांसाठी खुला केला असून, भेट देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. परंतु गडाच्या माथ्यावर सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना नसून स्वयंसेवकही नेमण्यात आलेले नाहीत. गडावर जाण्याच्या मार्गावरील निवारा शेडचीही वादळामध्ये दुरवस्था झाली असून, ते पुन्हा बांधण्याची मागणी केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या किल्ल्यांमध्ये कर्नाळाचा समावेश आहे. अभयारण्य व गडाला प्रत्येक वर्षी ८० हजार ते १ लाख नागरिक भेट देत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील निसर्ग भटकंतीसाठी सर्वांत आवडते ठिकाण म्हणूनही कर्नाळा प्रसिद्ध आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून हे ठिकाणही बंद केले होते. वनविभागाने १२ नोव्हेंबरला किल्ला पर्यटकांसाठी खुला केला आहे. भेट देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. या परिसराची देखभाल करण्यासाठी संयुक्त वनसमिती स्थापन करण्यात आली आहे. पर्यटकांकडून शुल्कही घेतले जात आहे. परंतु त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. गडावर जाताना यापूर्वी उभारण्यात आलेल्या निवारा शेडची वादळामध्ये दुरवस्था झाली आहे. पत्रे पडले आहेत. यामुळे डोंगर चढणाऱ्या नागरिकांना विश्रांतीसाठी जागाच उपलब्ध नाही. हे शेड पुन्हा तत्काळ उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

गडाच्या माथ्यावर मुख्य बालेकिल्ल्याच्या परिसरात स्वयंसेवक नेमण्याची आवश्यकता आहे. रविवारी तीन वाजण्याच्या सुमारास सुळक्यावरील मधमाश्या अचानक उठल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होेते. अशा प्रसंगात नक्की काय करायचे हे सांगण्यासाठी एकही स्वयंसेवक उपलब्ध नव्हता. माश्या पर्यटकांना चावल्या असत्या तर काय केले असते, असा प्रश्न उपस्थित होतो. 

आवश्यक उपाययोजनांची गरजn कर्नाळा किल्ला व अभयारण्य परिसरात मागील काही वर्षांत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी अनेक बदल केले आहेत. माहिती फलक सर्व ठिकाणी लावले आहेत. गडाचा इतिहास, आढळणारे पक्षी, मुलांसाठी खेळणी व इतर अनेक बदल केले आहेत. याच पद्धतीने गडावर स्वयंसेवक नेमण्यात यावेत व निवारा शेडचीही दुरुस्ती करून घ्यावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

आवश्यक उपाययोजनांची गरजकर्नाळा किल्ला व अभयारण्य परिसरात मागील काही वर्षांत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी अनेक बदल केले आहेत. माहिती फलक सर्व ठिकाणी लावले आहेत. गडाचा इतिहास, आढळणारे पक्षी, मुलांसाठी खेळणी व इतर अनेक बदल केले आहेत. याच पद्धतीने गडावर स्वयंसेवक नेमण्यात यावेत व निवारा शेडचीही दुरुस्ती करून घ्यावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल