शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वादात

By admin | Updated: February 22, 2016 00:43 IST

आदर्श शिक्षक, आदर्श अधिपरिचारिका यांना पुरस्कार देताना जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस घेतली जाते, मात्र आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार देताना ती का घेतली नाही, असा प्रश्न

अलिबाग : आदर्श शिक्षक, आदर्श अधिपरिचारिका यांना पुरस्कार देताना जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस घेतली जाते, मात्र आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार देताना ती का घेतली नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद शामकांत भोकरे यांनी केला. २९ फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याचे कारण देण्याच्या सूचना भोकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.निष्क्रिय ग्रामसेवकांना पुरस्कार देण्यात आल्याचा आरोप भोकरे यांनी केल्याने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याचे दिसून येते. भोकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेमध्ये पक्ष प्रतोद आहेत, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे हेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत, असे असताना भोकरे यांनी या पुरस्कारांवर आक्षेप घेतल्याने जिल्हा परिषदेच्या नेतृत्वालाच आव्हान दिल्याचे त्या निमित्ताने समोर आले आहे. जिल्ह्यातील ७५ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अलिबाग-कुरुळ येथील माळी समाज सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे होते. गेल्या पाच वर्षात ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. मागील पाच वर्षाचा अनुशेष भरुन काढीत जिल्हा परिषदेने तब्बल ७५ ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्याचे काम जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी करावे, असे आवाहन शेकापचे आमदार सुभाष पाटील यांनी केले. ग्रामीण भागात काम करणाऱ्या ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकार विकास योजनांसाठी निधी देत नाही. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे व्यापार धार्जिणे आहे. (प्रतिनिधी)आमदार सुभाष पाटील यांनी केली टीकाकेंद्र सरकार विकास योजनांसाठी निधी देत नाही. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे व्यापार धार्जिणे आहे. मेक इन इंडियाच्या नावाने सरकार देशातील जनतेची फसवणूक करीत असल्याची घणाघाती टीका आमदार पाटील यांनी केली. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, शिक्षण सभापती भाई पाशिलकर, अर्थ सभापती चित्रा पाटील, समाज कल्याण सभापती गीता जाधव, महिला, बालकल्याण सभापती प्रिया मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते.