शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

देवकान्हेतील वणव्याने वनसंपदेची प्रचंड हानी; उडदवणे गावालगतच्या घरांना झळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:48 IST

हिरव्या डोंगराचा अक्षरशः कोळसा झाला होता. वन्यजीव जळून गेले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या वनविभागाला हे दिसलेच नाही.

धाटाव : रोहा तालुक्यातील देवकान्हे गावच्या हद्दीतील डोंगरावर लागलेली आग, वाळलेले गवत व झाडीमुळे उडदवणे गावच्या हद्दीत येऊन पोहोचली. गावालगतच्या घरांनाही त्याची झळ बसली. इतकेच नाही तर ही आग कालव्याच्या पलीकडे जाऊन पोहोचली. उडदवणे गावच्या ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळविले; परंतु तोपर्यंत कित्येक हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले होते. 

रोह्यात उन्हाची काहिली प्रचंड वाढत आहे. डोंगरावर लागणाऱ्या वणव्यांमुळे जैवविविधता जळून खाक होत आहे. मात्र, वनसंपदा संरक्षण व जोपासना करण्यासाठी शासनाने नेमलेल्या वनविभागातील कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या गांभीर बाबीकडे लक्ष देण्यासाठी संबंधित विभागाकडे वेळ नसल्याचे या नुकत्याच लागलेल्या वणव्यावरून पाहावयास मिळते.

हिरव्या डोंगराचा अक्षरशः कोळसा झाला होता. वन्यजीव जळून गेले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या वनविभागाला हे दिसलेच नाही.वन्यजिवांचे रक्षण करणारे हे वनकर्मचारी काय करतात, याचासुद्धा विचार व्हायला हवा. रोहा तालुक्यात गेले कित्येक दिवस रोजच वणवे लागत आहेत. मात्र, हे नैसर्गिक नाहीत. वणवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना शासन केले गेले असते तर आज झालेली हानी थांबवता आली असती. मात्र, वनविभाग कर्मचऱ्यांना याबाबत गांभीर्य नाही. याच परिसरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी केलेली वृक्ष लागवड ही अशीच वणव्याच्या भक्ष्यस्थानी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडलेली होती. ज्या गरीब शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही शासनाने योग्य तो मोबदला द्यावा व अशा आगी परत लागणार नाहीत यासाठी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.