शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

देवकान्हेतील वणव्याने वनसंपदेची प्रचंड हानी; उडदवणे गावालगतच्या घरांना झळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:48 IST

हिरव्या डोंगराचा अक्षरशः कोळसा झाला होता. वन्यजीव जळून गेले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या वनविभागाला हे दिसलेच नाही.

धाटाव : रोहा तालुक्यातील देवकान्हे गावच्या हद्दीतील डोंगरावर लागलेली आग, वाळलेले गवत व झाडीमुळे उडदवणे गावच्या हद्दीत येऊन पोहोचली. गावालगतच्या घरांनाही त्याची झळ बसली. इतकेच नाही तर ही आग कालव्याच्या पलीकडे जाऊन पोहोचली. उडदवणे गावच्या ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळविले; परंतु तोपर्यंत कित्येक हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले होते. 

रोह्यात उन्हाची काहिली प्रचंड वाढत आहे. डोंगरावर लागणाऱ्या वणव्यांमुळे जैवविविधता जळून खाक होत आहे. मात्र, वनसंपदा संरक्षण व जोपासना करण्यासाठी शासनाने नेमलेल्या वनविभागातील कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या गांभीर बाबीकडे लक्ष देण्यासाठी संबंधित विभागाकडे वेळ नसल्याचे या नुकत्याच लागलेल्या वणव्यावरून पाहावयास मिळते.

हिरव्या डोंगराचा अक्षरशः कोळसा झाला होता. वन्यजीव जळून गेले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या वनविभागाला हे दिसलेच नाही.वन्यजिवांचे रक्षण करणारे हे वनकर्मचारी काय करतात, याचासुद्धा विचार व्हायला हवा. रोहा तालुक्यात गेले कित्येक दिवस रोजच वणवे लागत आहेत. मात्र, हे नैसर्गिक नाहीत. वणवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना शासन केले गेले असते तर आज झालेली हानी थांबवता आली असती. मात्र, वनविभाग कर्मचऱ्यांना याबाबत गांभीर्य नाही. याच परिसरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी केलेली वृक्ष लागवड ही अशीच वणव्याच्या भक्ष्यस्थानी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडलेली होती. ज्या गरीब शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही शासनाने योग्य तो मोबदला द्यावा व अशा आगी परत लागणार नाहीत यासाठी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.