शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घरकुलामुळे हक्काचा निवारा

By admin | Updated: April 9, 2017 01:28 IST

रायगड जिल्ह्यातील रमाई, शबरी व आदिम घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून, लाभार्थींना पहिला हप्ताही देण्यात आला आहे.

- जयंत धुळप,  अलिबाग

रायगड जिल्ह्यातील रमाई, शबरी व आदिम घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून, लाभार्थींना पहिला हप्ताही देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार २०३ कुटुंबांना योजनेमुळे हक्काचे घर मिळाले आहे. यात शबरी घरकूल योजनेंतर्गत ६१८, रमाई आवास योजनेंतर्गत ४२४, तर आदिम जमाती घरकूल योजनेंतर्गत १५६ कुटुंबांना घरे मिळाली आहेत.आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणारे व स्वत:चे घर नसणाऱ्या आदिवासी व बहुजन समाजातील कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकारने आदिम, शबरी, रमाई या योजना अमलात आणल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील लाभार्थींना या घरकूल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. लाभार्थींना घर बांधण्यासाठी १ लाख २० हजारांचे अनुदान सरकारमार्फत दिले जाते, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.शबरी घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६१८ लाभार्थींना घर अनुदान दिले असून, यामध्ये सर्वाधिक ९२ लाभार्थी आदिवासीबहूल कर्जत तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत पनवेल ८३, अलिबाग ७८, खालापूर ६१, महाड ४५, माणगाव ३४, म्हसळा ८, मुरु ड २५, पेण ४८, पोलादपूर १३, रोहा ५४, श्रीवर्धन १, सुधागड ४९, तळा १५, तर उरण तालुक्यात १२ कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे.रमाई आवास योजनेअंतर्गत ४२९ कुटुंबांना लाभ झाला असून, यामध्ये सर्वाधिक ८६ घरकुले महाड तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत अलिबाग १३, कर्जत ४६, खालापूर ३२, महाड ८६, माणगाव ८१, म्हसळा १९, मुरु ड १४, पनवेल ७, पेण ६, पोलादपूर २२, रोहा ४६, श्रीवर्धन ७, सुधागड २६, तळा २२ तर उरण तालुक्यात २ लाभार्थी कुटुंबे आहेत.माणगाव व कर्जतमध्ये २७ लाभार्थीआदिम जमाती घरकूल योजनेमध्ये एकूण १५६ कुटुंबांना लाभ झाला असून, त्यातील सर्वाधिक प्रत्येकी २७ लाभार्थी माणगाव व कर्जत तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत अलिबाग २०, खालापूर १५, महाड ५, म्हसळा २, मुरु ड ४, पनवेल २२, पोलादपूर १, रोहा ९, श्रीवर्धन ४, सुधागड १४, तळा ३, उरण ३ असे लाभार्थी आहेत.अनुदान थेट बँक खात्यात आदिम, शबरी व रमाई घरकूल योजनेत लाभार्थींना मिळणारे अनुदान हे आता थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होत आहे. परिणामी, त्यातील संभाव्य भ्रष्टाचार थांबू शकला आहे. लाभार्थींना मिळणारे अनुदान हे चार टप्प्यांत मिळत असून, जसे काम पूर्ण होते त्याप्रमाणे हप्ता खात्यात जमा केला जातो.