शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलामुळे हक्काचा निवारा

By admin | Updated: April 9, 2017 01:28 IST

रायगड जिल्ह्यातील रमाई, शबरी व आदिम घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून, लाभार्थींना पहिला हप्ताही देण्यात आला आहे.

- जयंत धुळप,  अलिबाग

रायगड जिल्ह्यातील रमाई, शबरी व आदिम घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून, लाभार्थींना पहिला हप्ताही देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार २०३ कुटुंबांना योजनेमुळे हक्काचे घर मिळाले आहे. यात शबरी घरकूल योजनेंतर्गत ६१८, रमाई आवास योजनेंतर्गत ४२४, तर आदिम जमाती घरकूल योजनेंतर्गत १५६ कुटुंबांना घरे मिळाली आहेत.आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणारे व स्वत:चे घर नसणाऱ्या आदिवासी व बहुजन समाजातील कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकारने आदिम, शबरी, रमाई या योजना अमलात आणल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील लाभार्थींना या घरकूल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. लाभार्थींना घर बांधण्यासाठी १ लाख २० हजारांचे अनुदान सरकारमार्फत दिले जाते, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.शबरी घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६१८ लाभार्थींना घर अनुदान दिले असून, यामध्ये सर्वाधिक ९२ लाभार्थी आदिवासीबहूल कर्जत तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत पनवेल ८३, अलिबाग ७८, खालापूर ६१, महाड ४५, माणगाव ३४, म्हसळा ८, मुरु ड २५, पेण ४८, पोलादपूर १३, रोहा ५४, श्रीवर्धन १, सुधागड ४९, तळा १५, तर उरण तालुक्यात १२ कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे.रमाई आवास योजनेअंतर्गत ४२९ कुटुंबांना लाभ झाला असून, यामध्ये सर्वाधिक ८६ घरकुले महाड तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत अलिबाग १३, कर्जत ४६, खालापूर ३२, महाड ८६, माणगाव ८१, म्हसळा १९, मुरु ड १४, पनवेल ७, पेण ६, पोलादपूर २२, रोहा ४६, श्रीवर्धन ७, सुधागड २६, तळा २२ तर उरण तालुक्यात २ लाभार्थी कुटुंबे आहेत.माणगाव व कर्जतमध्ये २७ लाभार्थीआदिम जमाती घरकूल योजनेमध्ये एकूण १५६ कुटुंबांना लाभ झाला असून, त्यातील सर्वाधिक प्रत्येकी २७ लाभार्थी माणगाव व कर्जत तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत अलिबाग २०, खालापूर १५, महाड ५, म्हसळा २, मुरु ड ४, पनवेल २२, पोलादपूर १, रोहा ९, श्रीवर्धन ४, सुधागड १४, तळा ३, उरण ३ असे लाभार्थी आहेत.अनुदान थेट बँक खात्यात आदिम, शबरी व रमाई घरकूल योजनेत लाभार्थींना मिळणारे अनुदान हे आता थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होत आहे. परिणामी, त्यातील संभाव्य भ्रष्टाचार थांबू शकला आहे. लाभार्थींना मिळणारे अनुदान हे चार टप्प्यांत मिळत असून, जसे काम पूर्ण होते त्याप्रमाणे हप्ता खात्यात जमा केला जातो.