शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात

By admin | Updated: December 4, 2015 00:25 IST

महाड तालुक्यातील सापे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागेश्वरी नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही

दासगांव : महाड तालुक्यातील सापे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागेश्वरी नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती असून याकडे औद्योगिक वसाहत नगरपंचायत समिती योग्यप्रकारे लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातील नडगावतर्फे तुडील ग्रुपग्रामपंचायत हद्दीत सापे हे गाव आहे. या गावासाठी गेली ३० वर्षे नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागेश्वरी नदीवर जॅकवेल बांधून ही योजना कार्यान्वित केली आहे. बारमाही वाहणाऱ्या नागेश्वरी नदीमुळे सापे गावाला कधीच पाणीटंचाई झाली नव्हती. मात्र गतवर्षीपासून येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.नागेश्वरी नदी रावढळ गावाजवळ सावित्री खाडीला मिळते. सावित्री खाडीमध्ये महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषित सांडपाणी सोडले जात आहे. हे पाणी भरतीच्या वेळी रावढळ पुलापासून पुढे नागेश्वरी नदीत जाऊन मिसळते. यासाठी रावढळ पुलानजिक बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा गेली दोन वर्षे नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे नागेश्वरीचे दूषित पाणी जॅकवेलच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत जाते. या प्रदूषणाचा फटका सापे ग्रामस्थांना बसला आहे. सापे ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यावरच गावातील आदिवासीवाडी, बौद्धवाडी, सुकुमवाडी, रसाळवाडी, मोहल्ला या वाड्यांतील जवळपास ८०० लोकसंख्या अवलंबून आहेत.दूषित पाण्यामुळे अंगाला खाज सुटणे, घरातील भांडी काळी पडणे असे त्रास ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवालही तालुका आरोग्य विभागाने दिला आहे. गावात केवळ एकच विंधन विहीर (बोरिंग) असल्याने सर्व भार या विंधन विहिरीवर पडत आहे. तेही पाणी दोन महिन्यांनंतर मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात दुसरी एक विहीर आहे. मात्र या विहिरीचे पाणी जेमतेम फेबु्रवारीपर्यंतच टिकते. यामुळे नळपाणीपुरवठा योजनेवरच सापे ग्रामस्थ अवलंबून आहेत, अशी माहिती गावातील पाणी कमिटीचे वसंत गोविंद भडवळकर, सचिव सत्यवान काशीराम रसाळ, ग्रामस्थ रामचंद्र धोंडू आगरे यांनी दिले. (वार्ताहर) दोन वर्षांपासून पाणीटंचाई होत आहे. नागेश्वरी नदीच्या प्रदूषणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करीत आहेत. मात्र औद्योगिक वसाहतीने याची दखल घेतली नाही. आम्हाला पाणी मिळाले नाही तर आम्ही आंदोलन करणार- रजनी बैकर, सरपंच