शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

डुक्कर फार्ममुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: August 24, 2015 02:35 IST

तालुक्यातील किकवी येथे वराह पालन व्यवसाय करणारा फार्म हाऊस बेकायदा पद्धतीने गेली चार वर्षे सुरू आहे. त्या मोकाट डुकरांमुळे परिसरातील सहा

कर्जत : तालुक्यातील किकवी येथे वराह पालन व्यवसाय करणारा फार्म हाऊस बेकायदा पद्धतीने गेली चार वर्षे सुरू आहे. त्या मोकाट डुकरांमुळे परिसरातील सहा गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डुकरांचे मलमूत्र आणि विष्ठा ही नाल्यातून चिल्लार नदीमध्ये येत आहे. त्या दुर्गंधीमुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. तो बेकायदा डुक्कर फार्म येथून अन्य ठिकाणी हलवावा आणि येथील व्यवसाय बंद करण्याचा ठराव पाथरज ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने घेतला आहे. पाथरज ग्रामपंचायत हद्दीमधील किकवी गावाच्या परिसरातील ६० एकर जागेमध्ये लुईस फार्म हाऊस आहे. तेथे गेल्या चार वर्षांपासून डुक्कर पालन करण्याचा व्यवसाय सुरू आहे. एकावेळी किमान दोन हजार डुकरांची पिल्ले तेथे आणली जातात. त्यांचे संगोपन करताना ८०-१०० वजनाचे झाल्यानंतर डुक्कर कत्तल करण्यासाठी येथून नेले जातात. मात्र या कालावधीत त्या डुकरांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर हे सर्व डुक्कर तेथील विस्तीर्ण जागेत फिरत असतात. येथील या दोन हजार डुकरांसाठी मुंबईच्या विविध हॉटेलमधून उष्टे आणि शिल्लक राहिलेले अन्न प्लास्टिक बॅगामधून किकवी येथे आणले जाते. त्या ४-५ टन एवढ्या मोठ्या संख्येने आणल्या जाणाऱ्या उष्ट्या अन्नामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होते. ते अन्न अस्ताव्यस्त पद्धतीने फार्महाऊसमध्ये भिरकावले जात असल्याने दुर्गंधी निर्माण होते. मुंबईमधून आणलेले अन्न ज्या प्लास्टिक पिशव्यांमधून किकवी येथे आणले जाते, त्या सर्व पिशव्या जमिनीमध्ये न गाडता किकवी गावाच्या रस्त्यालगत फेकून देण्यात येत आहेत. या सर्व दुर्गंधी पसरवणाऱ्या गोष्टींमुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खरबाचीवाडी, किकवी, शिलार, शिलारवाडी, बोरवाडी आणि आणखी काही वाड्यांमधील लोकांना घराबाहेर मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून बसायची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. त्यात आणखी भर म्हणजे लुईस फार्म हाऊसमधील डुकरांची विष्ठा आणि मलमूत्र हे तेथील नाल्यातून चिल्लार नदीमध्ये सोडले जात आहे. चिल्लार नदी पुढे बारमाही वाहत्या उल्हास नदीला जाऊन मिळते. या विष्ठेमुळे चिल्लार नदी देखील दूषित होत आहे. या नदीच्या तीरावर अनेक नळपाणी योजना असून पुढील काळात त्यांचे पाणी दूषित होऊन त्या पाणी योजनांचे पाणी पिणाऱ्या लोकांचे देखील आरोग्य धोक्यात येणार आहे. डुक्कर फार्म तेथून हलवावा आणि संपूर्ण व्यवहार, व्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी पाथरज ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मोहन शिंगटे यांनी ग्रामसभेत केली. ग्रामसभेने एकमताने हा ठराव मंजूर केला असून डुक्कर फार्म हाऊस बंद न केल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. (वार्ताहर)