शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

ग्रा.पं. निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज

By admin | Updated: July 17, 2017 01:27 IST

ग्रामीण विभागाच्या विकासासाठी सर्वाेच्च मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींमधील सरपंच थेट निवडण्याची घोषणा सरकारने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ग्रामीण विभागाच्या विकासासाठी सर्वाेच्च मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींमधील सरपंच थेट निवडण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काही कालावधीत निघण्याची शक्यता असल्याने रायगड जिल्ह्यात पुढील कालावधीत होऊ घातलेल्या सुमारे २४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर त्याचा थेट परिणाम होणार असल्याचे बोलले जाते. पंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा हे प्रमुख पक्ष आहेत. जिल्ह्यात सुमारे ८२७ ग्रामपंचायती आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींवर शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. रायगड जिल्हा परिषदेवरही याच दोन प्रमुख पक्षांनी सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलेले आहे. शिवसेना मोठ्या प्रमाणात शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर भाजपाला अद्याप प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत असल्याचे चित्र आहे. काँग्रेस तळागाळातील पक्ष असला तरी त्यांनाही नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या पनवेल महानगरपालिकेत भाजपाने शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीसह शिवसेनेचा दारुण पराभव केला ही तेवढी जमेची बाजू म्हणावी लागेल.ग्रामीण भागावर ज्या पक्षाचे वर्चस्व मजबूत असते त्यांना ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद आणि विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका सोप्या जातात. घटनेने ग्रामपंचायतीला आणि ग्रामसभेला महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. याच ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ती म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच हा थेट जनतेमधून निवडून द्यायचा. नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसाठी ही अशीच थेट निवडणूक घेण्यात आली होती. त्यामुळे सत्ता एका पक्षाची आली असली तरी, नगराध्यक्ष मात्र दुसऱ्याच पक्षाचा विराजमान झालेला पहायला मिळाला. त्याच पध्दतीने सरपंचाची निवड ही थेट जनतेने मतदान करून करावी याबाबत भाजपा सरकार गंभीर असल्याचे बोलले जाते.सरकारने याबाबत आपला शासन निर्णय काढलेला नसला तरी, तो काही कालावधीमध्ये निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा परिणाम रायगड जिल्ह्यात पुढील पाच महिन्यांत होऊ घातलेल्या २४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. हा निर्णय अमलात आला तर, राजकीय समीकरण बदलणार असल्याचे मानले जाते.