शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

जिल्ह्यात घरोघरी सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 02:10 IST

उत्साहाचे वातावरण : माहेरवाशिणींसाठी महत्त्वाचा सण

दत्ता म्हात्रे 

पेण : माहेरवाशिणी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो आनंदाचा क्षण म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा होय. असे म्हणतात की, महालक्ष्मी देवीला माहेरपणाचे सुख अनुभवावेसे वाटले तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा दिवस अशी आख्यायिका पुराणातील कथांमध्ये आढळते. श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गौराईच्या आगमनाची प्रतीक्षा लागते. कोकणात गौरी-गणपतीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, इतके औत्सुक्य गौराईच्या आगमनप्रसंगी असते. रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड जंजिरा व मुंबई, ठाणे आगरी-कोळी पट्ट्यात गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा के ला जातो.

गौराई घरात येणार या अनुभूतीनेच गौरीची आरास, तिचा साजश्रुंगार व तिच्या नैवेद्यापर्यंतची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू केली जाते. माहेरवासिनींना गौरी सणात माहेरच्या आठवणींना उजाळा देता येतो. मानवी समाज संस्कृतीतील बालपणीच्या बालहट्ट, रुसवे, फुगवे प्रकट करण्यासाठी गौरी-गणपती सण उत्सव हे मोठे व्यासपीठ आहे. गौराईच्या आगमनाची सासरवासिनी आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती आगमन झाल्यानंतर चार दिवसांनी गौराईचे आगमन होते. स्थळपरत्वे गौरीची सजावट, साजश्रुंगार व नैवेद्य दाखविण्याची प्रथा, परंपरा वेगवेगळी असते. मुंबई, ठाणे, रायगड, तळकोकणात या सणाचा उत्साह शिगेला पोहोचतो.ज्येष्ठा नक्षत्रावर आगमन होते म्हणून महालक्ष्मीला ज्येष्ठा गौर तर तिची सखी पार्वती कनिष्ठा. जगाच्या पालनकर्ती या आद्यशक्तीची पाद्यपूजा व माहेरपणातील गोड स्मृतींना उजाळा देण्यासाठी या गौराई बनून ही गौर कुटुंबव्यवस्थेतील नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी भाद्रपद महिन्यात अवतरतात. तर आश्विन महिन्यात नवदुर्गेचे रूप घेऊन शक्तिपीठात पाद्यपूजेचा मान घेतात. कोकणात गौरीपूजेचा थाटमाट काही औरच असतो. गुरुवारी गौराईचे आगमन झाले आहे. शुक्रवारी पूजन तर शनिवारी विर्सजन होईल. अशाप्रकारे अडीच दिवसांचा पाहुणचार मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. गौरी या प्रामुख्याने खड्यांच्या, तेरड्याच्या, मुखवटे, शाडूमातीच्या मूर्तीरूपात मांडल्या जातात.प्राचीन परंपराच्दोन दिवस रात्रभर नाचगाणी, गप्पाटप्पा, उखाणे म्हणत महिलांची व सखींची धम्माल सुरू असते. नवविवाहितांचा पहिला माहेरपण म्हणून गौरीची पूजापाठ संपन्न होते.च्पाच सुपांमध्ये फळे, फुले, पाच प्रकारच्या भाज्या, धान्य, नारळ, काळे मण्यांचा पोत, हिरव्या बांगड्या, हळदकुंकू भरून गौरीची ओटी भरली जाते. याला ओवसा म्हणतात.च्गौरीचे आगमन सुखसमृद्धीचे प्रतीक असल्याने माहेरवाशिणींची ही प्राचीनकाळापासून परंपरा चालत आली असून ती आजसुद्धा पाळली जाते. विसर्जनाच्या मध्यरात्री गौरीच्या आणलेल्या विविध वनस्पतीच्या पत्री नवीन सुपात गौरीच्या जवळ ठेवतात.च्तो तिचा ओवसा आरतीनंतर पाच सुवासिनी पाठवणीची गाणी गात घरभर फिरवतात, या वेळी गौराईचा माहेरवास संपतो.कर्जत : गौरीचे गुरु वारी आगमन असल्याने सुवासिनींनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. काही आदिवासी महिला गौरीची (कचोऱ्याची) फुले, कमळाची फुले, सुपे, तेरड्याची रोपे, केळीची पाने विकण्यासाठी बाजारात आणली होती. तर काहींनी रानात जाऊन कचोºयाची फुले आणून घराबाहेर ठेवली. त्यानंतर संध्याकाळी सुवासिनींनी गौरी आगमनाचे सर्व साहित्य तळ्यावर नेऊन तेथे सारी बांधाबांध करून दिवेलागणीच्या वेळी तयार केलेल्या गौरी घरी आणल्या.बाजारात खरेदीसाठी महिलांची गर्दीच्रेवदंडा : महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सण म्हणजे गौरींचे आगमन सोनपावलांनी झाले.च्पावसाचा जोर असताना महिलांना गौरीचा मुखवटा, आभूषणे, विविध प्रकारची फळे, फुले खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. हलवाई दुकानात ग्राहकांची वर्दळ जाणवत होती.च्रेवदंडा गावात नाचºया गौरींचे आकर्षण आजही असल्याने चाकरमानी मंडळी गावाकडे त्यासाठी मुक्काम हमखास करतात. नाचºया गौरी सजवण्यासाठी महिलांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. 

टॅग्स :RaigadरायगडGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganpati Festivalगणेशोत्सव