शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

जिल्ह्यात घरोघरी सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 02:10 IST

उत्साहाचे वातावरण : माहेरवाशिणींसाठी महत्त्वाचा सण

दत्ता म्हात्रे 

पेण : माहेरवाशिणी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो आनंदाचा क्षण म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा होय. असे म्हणतात की, महालक्ष्मी देवीला माहेरपणाचे सुख अनुभवावेसे वाटले तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा दिवस अशी आख्यायिका पुराणातील कथांमध्ये आढळते. श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गौराईच्या आगमनाची प्रतीक्षा लागते. कोकणात गौरी-गणपतीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, इतके औत्सुक्य गौराईच्या आगमनप्रसंगी असते. रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड जंजिरा व मुंबई, ठाणे आगरी-कोळी पट्ट्यात गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा के ला जातो.

गौराई घरात येणार या अनुभूतीनेच गौरीची आरास, तिचा साजश्रुंगार व तिच्या नैवेद्यापर्यंतची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू केली जाते. माहेरवासिनींना गौरी सणात माहेरच्या आठवणींना उजाळा देता येतो. मानवी समाज संस्कृतीतील बालपणीच्या बालहट्ट, रुसवे, फुगवे प्रकट करण्यासाठी गौरी-गणपती सण उत्सव हे मोठे व्यासपीठ आहे. गौराईच्या आगमनाची सासरवासिनी आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती आगमन झाल्यानंतर चार दिवसांनी गौराईचे आगमन होते. स्थळपरत्वे गौरीची सजावट, साजश्रुंगार व नैवेद्य दाखविण्याची प्रथा, परंपरा वेगवेगळी असते. मुंबई, ठाणे, रायगड, तळकोकणात या सणाचा उत्साह शिगेला पोहोचतो.ज्येष्ठा नक्षत्रावर आगमन होते म्हणून महालक्ष्मीला ज्येष्ठा गौर तर तिची सखी पार्वती कनिष्ठा. जगाच्या पालनकर्ती या आद्यशक्तीची पाद्यपूजा व माहेरपणातील गोड स्मृतींना उजाळा देण्यासाठी या गौराई बनून ही गौर कुटुंबव्यवस्थेतील नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी भाद्रपद महिन्यात अवतरतात. तर आश्विन महिन्यात नवदुर्गेचे रूप घेऊन शक्तिपीठात पाद्यपूजेचा मान घेतात. कोकणात गौरीपूजेचा थाटमाट काही औरच असतो. गुरुवारी गौराईचे आगमन झाले आहे. शुक्रवारी पूजन तर शनिवारी विर्सजन होईल. अशाप्रकारे अडीच दिवसांचा पाहुणचार मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. गौरी या प्रामुख्याने खड्यांच्या, तेरड्याच्या, मुखवटे, शाडूमातीच्या मूर्तीरूपात मांडल्या जातात.प्राचीन परंपराच्दोन दिवस रात्रभर नाचगाणी, गप्पाटप्पा, उखाणे म्हणत महिलांची व सखींची धम्माल सुरू असते. नवविवाहितांचा पहिला माहेरपण म्हणून गौरीची पूजापाठ संपन्न होते.च्पाच सुपांमध्ये फळे, फुले, पाच प्रकारच्या भाज्या, धान्य, नारळ, काळे मण्यांचा पोत, हिरव्या बांगड्या, हळदकुंकू भरून गौरीची ओटी भरली जाते. याला ओवसा म्हणतात.च्गौरीचे आगमन सुखसमृद्धीचे प्रतीक असल्याने माहेरवाशिणींची ही प्राचीनकाळापासून परंपरा चालत आली असून ती आजसुद्धा पाळली जाते. विसर्जनाच्या मध्यरात्री गौरीच्या आणलेल्या विविध वनस्पतीच्या पत्री नवीन सुपात गौरीच्या जवळ ठेवतात.च्तो तिचा ओवसा आरतीनंतर पाच सुवासिनी पाठवणीची गाणी गात घरभर फिरवतात, या वेळी गौराईचा माहेरवास संपतो.कर्जत : गौरीचे गुरु वारी आगमन असल्याने सुवासिनींनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. काही आदिवासी महिला गौरीची (कचोऱ्याची) फुले, कमळाची फुले, सुपे, तेरड्याची रोपे, केळीची पाने विकण्यासाठी बाजारात आणली होती. तर काहींनी रानात जाऊन कचोºयाची फुले आणून घराबाहेर ठेवली. त्यानंतर संध्याकाळी सुवासिनींनी गौरी आगमनाचे सर्व साहित्य तळ्यावर नेऊन तेथे सारी बांधाबांध करून दिवेलागणीच्या वेळी तयार केलेल्या गौरी घरी आणल्या.बाजारात खरेदीसाठी महिलांची गर्दीच्रेवदंडा : महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सण म्हणजे गौरींचे आगमन सोनपावलांनी झाले.च्पावसाचा जोर असताना महिलांना गौरीचा मुखवटा, आभूषणे, विविध प्रकारची फळे, फुले खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. हलवाई दुकानात ग्राहकांची वर्दळ जाणवत होती.च्रेवदंडा गावात नाचºया गौरींचे आकर्षण आजही असल्याने चाकरमानी मंडळी गावाकडे त्यासाठी मुक्काम हमखास करतात. नाचºया गौरी सजवण्यासाठी महिलांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. 

टॅग्स :RaigadरायगडGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganpati Festivalगणेशोत्सव