शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

जिल्ह्यात घरोघरी सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 02:10 IST

उत्साहाचे वातावरण : माहेरवाशिणींसाठी महत्त्वाचा सण

दत्ता म्हात्रे 

पेण : माहेरवाशिणी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो आनंदाचा क्षण म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा होय. असे म्हणतात की, महालक्ष्मी देवीला माहेरपणाचे सुख अनुभवावेसे वाटले तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा दिवस अशी आख्यायिका पुराणातील कथांमध्ये आढळते. श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गौराईच्या आगमनाची प्रतीक्षा लागते. कोकणात गौरी-गणपतीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, इतके औत्सुक्य गौराईच्या आगमनप्रसंगी असते. रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड जंजिरा व मुंबई, ठाणे आगरी-कोळी पट्ट्यात गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा के ला जातो.

गौराई घरात येणार या अनुभूतीनेच गौरीची आरास, तिचा साजश्रुंगार व तिच्या नैवेद्यापर्यंतची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू केली जाते. माहेरवासिनींना गौरी सणात माहेरच्या आठवणींना उजाळा देता येतो. मानवी समाज संस्कृतीतील बालपणीच्या बालहट्ट, रुसवे, फुगवे प्रकट करण्यासाठी गौरी-गणपती सण उत्सव हे मोठे व्यासपीठ आहे. गौराईच्या आगमनाची सासरवासिनी आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती आगमन झाल्यानंतर चार दिवसांनी गौराईचे आगमन होते. स्थळपरत्वे गौरीची सजावट, साजश्रुंगार व नैवेद्य दाखविण्याची प्रथा, परंपरा वेगवेगळी असते. मुंबई, ठाणे, रायगड, तळकोकणात या सणाचा उत्साह शिगेला पोहोचतो.ज्येष्ठा नक्षत्रावर आगमन होते म्हणून महालक्ष्मीला ज्येष्ठा गौर तर तिची सखी पार्वती कनिष्ठा. जगाच्या पालनकर्ती या आद्यशक्तीची पाद्यपूजा व माहेरपणातील गोड स्मृतींना उजाळा देण्यासाठी या गौराई बनून ही गौर कुटुंबव्यवस्थेतील नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी भाद्रपद महिन्यात अवतरतात. तर आश्विन महिन्यात नवदुर्गेचे रूप घेऊन शक्तिपीठात पाद्यपूजेचा मान घेतात. कोकणात गौरीपूजेचा थाटमाट काही औरच असतो. गुरुवारी गौराईचे आगमन झाले आहे. शुक्रवारी पूजन तर शनिवारी विर्सजन होईल. अशाप्रकारे अडीच दिवसांचा पाहुणचार मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. गौरी या प्रामुख्याने खड्यांच्या, तेरड्याच्या, मुखवटे, शाडूमातीच्या मूर्तीरूपात मांडल्या जातात.प्राचीन परंपराच्दोन दिवस रात्रभर नाचगाणी, गप्पाटप्पा, उखाणे म्हणत महिलांची व सखींची धम्माल सुरू असते. नवविवाहितांचा पहिला माहेरपण म्हणून गौरीची पूजापाठ संपन्न होते.च्पाच सुपांमध्ये फळे, फुले, पाच प्रकारच्या भाज्या, धान्य, नारळ, काळे मण्यांचा पोत, हिरव्या बांगड्या, हळदकुंकू भरून गौरीची ओटी भरली जाते. याला ओवसा म्हणतात.च्गौरीचे आगमन सुखसमृद्धीचे प्रतीक असल्याने माहेरवाशिणींची ही प्राचीनकाळापासून परंपरा चालत आली असून ती आजसुद्धा पाळली जाते. विसर्जनाच्या मध्यरात्री गौरीच्या आणलेल्या विविध वनस्पतीच्या पत्री नवीन सुपात गौरीच्या जवळ ठेवतात.च्तो तिचा ओवसा आरतीनंतर पाच सुवासिनी पाठवणीची गाणी गात घरभर फिरवतात, या वेळी गौराईचा माहेरवास संपतो.कर्जत : गौरीचे गुरु वारी आगमन असल्याने सुवासिनींनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. काही आदिवासी महिला गौरीची (कचोऱ्याची) फुले, कमळाची फुले, सुपे, तेरड्याची रोपे, केळीची पाने विकण्यासाठी बाजारात आणली होती. तर काहींनी रानात जाऊन कचोºयाची फुले आणून घराबाहेर ठेवली. त्यानंतर संध्याकाळी सुवासिनींनी गौरी आगमनाचे सर्व साहित्य तळ्यावर नेऊन तेथे सारी बांधाबांध करून दिवेलागणीच्या वेळी तयार केलेल्या गौरी घरी आणल्या.बाजारात खरेदीसाठी महिलांची गर्दीच्रेवदंडा : महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सण म्हणजे गौरींचे आगमन सोनपावलांनी झाले.च्पावसाचा जोर असताना महिलांना गौरीचा मुखवटा, आभूषणे, विविध प्रकारची फळे, फुले खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. हलवाई दुकानात ग्राहकांची वर्दळ जाणवत होती.च्रेवदंडा गावात नाचºया गौरींचे आकर्षण आजही असल्याने चाकरमानी मंडळी गावाकडे त्यासाठी मुक्काम हमखास करतात. नाचºया गौरी सजवण्यासाठी महिलांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. 

टॅग्स :RaigadरायगडGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganpati Festivalगणेशोत्सव