शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात घरोघरी सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 02:10 IST

उत्साहाचे वातावरण : माहेरवाशिणींसाठी महत्त्वाचा सण

दत्ता म्हात्रे 

पेण : माहेरवाशिणी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो आनंदाचा क्षण म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा होय. असे म्हणतात की, महालक्ष्मी देवीला माहेरपणाचे सुख अनुभवावेसे वाटले तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा दिवस अशी आख्यायिका पुराणातील कथांमध्ये आढळते. श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गौराईच्या आगमनाची प्रतीक्षा लागते. कोकणात गौरी-गणपतीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, इतके औत्सुक्य गौराईच्या आगमनप्रसंगी असते. रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड जंजिरा व मुंबई, ठाणे आगरी-कोळी पट्ट्यात गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा के ला जातो.

गौराई घरात येणार या अनुभूतीनेच गौरीची आरास, तिचा साजश्रुंगार व तिच्या नैवेद्यापर्यंतची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू केली जाते. माहेरवासिनींना गौरी सणात माहेरच्या आठवणींना उजाळा देता येतो. मानवी समाज संस्कृतीतील बालपणीच्या बालहट्ट, रुसवे, फुगवे प्रकट करण्यासाठी गौरी-गणपती सण उत्सव हे मोठे व्यासपीठ आहे. गौराईच्या आगमनाची सासरवासिनी आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती आगमन झाल्यानंतर चार दिवसांनी गौराईचे आगमन होते. स्थळपरत्वे गौरीची सजावट, साजश्रुंगार व नैवेद्य दाखविण्याची प्रथा, परंपरा वेगवेगळी असते. मुंबई, ठाणे, रायगड, तळकोकणात या सणाचा उत्साह शिगेला पोहोचतो.ज्येष्ठा नक्षत्रावर आगमन होते म्हणून महालक्ष्मीला ज्येष्ठा गौर तर तिची सखी पार्वती कनिष्ठा. जगाच्या पालनकर्ती या आद्यशक्तीची पाद्यपूजा व माहेरपणातील गोड स्मृतींना उजाळा देण्यासाठी या गौराई बनून ही गौर कुटुंबव्यवस्थेतील नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी भाद्रपद महिन्यात अवतरतात. तर आश्विन महिन्यात नवदुर्गेचे रूप घेऊन शक्तिपीठात पाद्यपूजेचा मान घेतात. कोकणात गौरीपूजेचा थाटमाट काही औरच असतो. गुरुवारी गौराईचे आगमन झाले आहे. शुक्रवारी पूजन तर शनिवारी विर्सजन होईल. अशाप्रकारे अडीच दिवसांचा पाहुणचार मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. गौरी या प्रामुख्याने खड्यांच्या, तेरड्याच्या, मुखवटे, शाडूमातीच्या मूर्तीरूपात मांडल्या जातात.प्राचीन परंपराच्दोन दिवस रात्रभर नाचगाणी, गप्पाटप्पा, उखाणे म्हणत महिलांची व सखींची धम्माल सुरू असते. नवविवाहितांचा पहिला माहेरपण म्हणून गौरीची पूजापाठ संपन्न होते.च्पाच सुपांमध्ये फळे, फुले, पाच प्रकारच्या भाज्या, धान्य, नारळ, काळे मण्यांचा पोत, हिरव्या बांगड्या, हळदकुंकू भरून गौरीची ओटी भरली जाते. याला ओवसा म्हणतात.च्गौरीचे आगमन सुखसमृद्धीचे प्रतीक असल्याने माहेरवाशिणींची ही प्राचीनकाळापासून परंपरा चालत आली असून ती आजसुद्धा पाळली जाते. विसर्जनाच्या मध्यरात्री गौरीच्या आणलेल्या विविध वनस्पतीच्या पत्री नवीन सुपात गौरीच्या जवळ ठेवतात.च्तो तिचा ओवसा आरतीनंतर पाच सुवासिनी पाठवणीची गाणी गात घरभर फिरवतात, या वेळी गौराईचा माहेरवास संपतो.कर्जत : गौरीचे गुरु वारी आगमन असल्याने सुवासिनींनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. काही आदिवासी महिला गौरीची (कचोऱ्याची) फुले, कमळाची फुले, सुपे, तेरड्याची रोपे, केळीची पाने विकण्यासाठी बाजारात आणली होती. तर काहींनी रानात जाऊन कचोºयाची फुले आणून घराबाहेर ठेवली. त्यानंतर संध्याकाळी सुवासिनींनी गौरी आगमनाचे सर्व साहित्य तळ्यावर नेऊन तेथे सारी बांधाबांध करून दिवेलागणीच्या वेळी तयार केलेल्या गौरी घरी आणल्या.बाजारात खरेदीसाठी महिलांची गर्दीच्रेवदंडा : महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सण म्हणजे गौरींचे आगमन सोनपावलांनी झाले.च्पावसाचा जोर असताना महिलांना गौरीचा मुखवटा, आभूषणे, विविध प्रकारची फळे, फुले खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. हलवाई दुकानात ग्राहकांची वर्दळ जाणवत होती.च्रेवदंडा गावात नाचºया गौरींचे आकर्षण आजही असल्याने चाकरमानी मंडळी गावाकडे त्यासाठी मुक्काम हमखास करतात. नाचºया गौरी सजवण्यासाठी महिलांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. 

टॅग्स :RaigadरायगडGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganpati Festivalगणेशोत्सव