शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल सागरतट अभियानांतर्गत निधिवाटप

By admin | Updated: December 31, 2016 02:41 IST

राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राहावेत या उद्देशाने निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय सागरतट

अलिबाग : राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राहावेत या उद्देशाने निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समित्या स्थापन केल्याआहेत. याच योजनेंतर्गत रायगडमधील ११ किनारी गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १० किनारी गावांतील ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समिती प्रमुखांना शुक्रवारी पहिल्या टप्प्यात एकूण अनुदानाच्या ४० टक्के अनुदानाचे धनादेश अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.राज्यातील ७३ ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समित्यांना गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी निधीचे वाटप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील काशिद आणि नागाव (अलिबाग) या दोन गावांच्या समित्यांना प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात येणार असून, त्यापैकी ८ लाखांचा धनादेश देण्यात आला. दिवेआगर गाव समितीस १५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून ६ लाखांचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित आवास, मिळकतखार, किहिम, आक्षी, रेवदंडा, हरिहरेश्वर, नागाव (उरण) या १० गावांना निधीचे वाटप करण्यात येत आहे. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे उपसंचालक व समन्वयक राय सिंघानिया, सागरी अभियंता प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)