शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

निर्मल सागरतट अभियानांतर्गत निधिवाटप

By admin | Updated: December 31, 2016 02:41 IST

राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राहावेत या उद्देशाने निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय सागरतट

अलिबाग : राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राहावेत या उद्देशाने निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समित्या स्थापन केल्याआहेत. याच योजनेंतर्गत रायगडमधील ११ किनारी गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १० किनारी गावांतील ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समिती प्रमुखांना शुक्रवारी पहिल्या टप्प्यात एकूण अनुदानाच्या ४० टक्के अनुदानाचे धनादेश अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.राज्यातील ७३ ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समित्यांना गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी निधीचे वाटप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील काशिद आणि नागाव (अलिबाग) या दोन गावांच्या समित्यांना प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात येणार असून, त्यापैकी ८ लाखांचा धनादेश देण्यात आला. दिवेआगर गाव समितीस १५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून ६ लाखांचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित आवास, मिळकतखार, किहिम, आक्षी, रेवदंडा, हरिहरेश्वर, नागाव (उरण) या १० गावांना निधीचे वाटप करण्यात येत आहे. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे उपसंचालक व समन्वयक राय सिंघानिया, सागरी अभियंता प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)