शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क

By admin | Updated: November 27, 2015 02:12 IST

आपली घटना ज्या व्यक्तींनी तयार केली, त्यांना देश समजला होता. त्यामुळे प्रत्येकाला घटना समजण्याची गरज आहे. घटनेमध्ये बारकाईने पाहिल्यास, कोणताही गट, जात, धर्मापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा आहे.

अलिबाग : आपली घटना ज्या व्यक्तींनी तयार केली, त्यांना देश समजला होता. त्यामुळे प्रत्येकाला घटना समजण्याची गरज आहे. घटनेमध्ये बारकाईने पाहिल्यास, कोणताही गट, जात, धर्मापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा आहे. व्यक्ती ही सर्वात मोठी असते. एक व्यक्ती सर्व विश्व बदलू शकते. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, त्यामुळे घटना वाचाल तरच घटनेचे महत्त्व समजेल, असे मत मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता व संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. संजय रानडे यांनी व्यक्त केले. वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयाच्या वतीने संविधान दिन सोहळ््याचे आयोजन गुरु वारी करण्यात आले होते. त्यावेळी संविधान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रानडे बोलत होते. संविधान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रानडे यांनी धर्मनिरपेक्षता, समता, समाजरचना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी मुद्द्यांचे विश्लेषण केले. ते म्हणाले, जी घटना तयार करण्यात आली त्यासाठी सर्व प्रदेशाचा विचार करण्यात आला होता. प्रत्येकाला आपला जाती, धर्म महत्त्वाचा वाटत आहे. समता ही जबरदस्तीने तयार करता येत नाही, तर ती मनात असली पाहिजे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोण्या गटासाठी नसून प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. त्यामुळे त्यातून ती व्यक्ती आमूलाग्र बदल घडवून आणू शकते,असा विश्वास डॉ.रानडे यांनी व्यक्त केला.यावेळी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. अतुल साळुंके, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक, प्रा. डॉ. प्रगती पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख प्रा. सानिका बाम आदी मान्यवर, विविध विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएसचे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माच्या सुरु वातीला विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. या प्रसंगी संविधानाचे वाचनही करण्यात आले. डॉ. संजय रानडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. (विशेष प्रतिनिधी)