शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

विमा काढण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:20 IST

कर्जत तालुक्यात शेकडो पालकांना गंडा

कर्जत : तालुक्यातील माध्यमिक शाळांत स्पर्धा घेऊन विजेत्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कार्यालयात बोलावून फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. पकडले जाऊ नये म्हणून विमा कार्यालय चालविणारे दोन एजंट गायब झाले असल्याने या ठिकाणी पैसे गुंतवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शाळा संस्था यांनी खबरदारी न घेतल्याने असंख्य पालकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.सप्टेंबर महिन्यात कर्जत तालुक्यातील तीन प्रमुख शाळांत आपण एलआयसी विमा कंपनीचे गोल्डन कार्ड होल्डर एजंट असल्याचे सांगून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली. ठाणे आणि चेंबूर येथे निवास करणारे दोन्ही एजंटनी कर्जत शहरात मुख्य वस्तीत कार्यालय घेतले. त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना मोठ्या बक्षिसांचे आमिष दाखवली. १० ते ३० हजारांचे रोख बक्षीस, हॉलिडे टूर आणि संगणक प्रशिक्षण अशी लालूच दाखविणाºया त्या दोन्ही विमा एजंट यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करण्यास सुरु वात करून विद्यार्थ्यांचा विमा काढायला सांगू लागले. तालुक्यात झुगरेवाडीतील एका कुटुंबाकडे विमा एजंटने विम्यासाठी तगादा लावल्याने त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या अनसूया पादिर यांची मदत घेतली. पादिर यांनी नेरळ पोलिसांना तक्रार करताच विमा एजंटांनी कर्जतमधून गाशा गुंडाळला.चित्रकला तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धा घेतलेल्या नेरळ विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक मंगेश सुतक यांनी, शाळेत सर्व विद्यार्थ्यांना नोटीस काढून विमा कार्यालयात जाऊ नये, असे जाहीर केले आहे. त्याचवेळी त्यांनी सदर प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात लेखी तक्र ार देखील दिली आहे. या सर्व प्रकारात रायगड जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या त्या दोन विमा एजंटांनी त्यांच्याकडे काम करणाºया स्थानिक ९ तरु णांना एकही दिवसाचा पगार दिला नाही. त्यांना कबूल केलेला पगार हा त्या एजंटांनी बुडविला असून त्यांचे नंबर पालकांकडे असल्याने त्यांना देखील पालकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीRaigadरायगड