शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

मच्छिमारांच्या मोर्चाने मुंबई दणाणली

By admin | Updated: March 17, 2016 23:34 IST

पारंपरिक मच्छिमार एकवटले : पर्ससीन नेट ट्रॉलर्सवर संपूर्ण बंदीची मागणी

रत्नागिरी : पर्ससीन नेट ट्रॉलर्सवर संपूर्ण बंदी आणण्यासाठी सुमारे १५ हजार पारंपरिक व छोट्या मच्छिमारांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून आझाद मैदानावर गुरुवारी प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चामध्ये पर्ससीन नेटवर बंदी घालण्याच्या महिला व मच्छिमारांच्या घोषणेने आझाद मैदान दणाणले होते.हा प्रचंड मोर्चा पर्ससीन नेट ट्रॉलर्सविरोधी संघर्ष समिती आणि अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने संयुक्तपणे काढला. पर्ससीन नेट ट्रॉलर्सना एका आठवड्यात परवाने देण्याची घोषणा मत्स्यव्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत जाहीर केली होती. या घोषणेचा निषेध करण्यासाठी पारंपरिक व छोट्या मच्छिमारांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पर्ससीन नेट ट्रॉलर्सचे सर्व परवाने रद्द करावेत, पर्ससीन नेटला राज्यात बंदीचा कायदा करावा, ओएनजीसी कंपनीने जानेवारी २०१५ ते ३१ मे २०१५पर्यंत सर्व्हेमुळे पालघर, ठाणे व मुंबईतील मच्छिमारांना ५०० कोटी रुपये नुकसानभरपाई या कंपनीकडून मिळावी, चित्रा व खलिजा टक्करीमुळे ८ कोटी ३५ लाख रुपये कोळी महिलांना व मच्छिमारांना मिळावेत, मुंबईतील १०० मासळी बाजारांमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा ताबडतोब देण्यात याव्या, मुंबईच्या कोस्टल रोडमुळे एकाही कोळीवाड्याची घरे व बंदराला धोका निर्माण होता कामा नये, कफपरेड समुद्रात ४२ एकर भराव टाकून शिवस्मारकामुळे २५ हजार मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आला आहे, त्यामुळे हे शिवस्मारक बांद्रा बॅण्ड स्टॅण्ड समोरील समुद्रातील खडकाळ जागेवर बांधण्यात यावे, या प्रमुख मागण्या मोर्चातील पारंपरिक मच्छिमारांच्या होत्या. या मोर्चात सहभागी होण्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व मुंबईतील सर्व मच्छिमारांनी नौका बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी मच्छिमार महिला व पुरुष या मोर्चामध्ये सुमारे १५ हजारांच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो, सरचिटणीस संजय कोळी, उपाध्यक्ष अशोक अंभिरे, रवी म्हात्रे, मोहन बावरे, दिलीप माठक, हरेश भानजी, देवेंद्र तांडेल यांनी केले. (शहर वार्ताहर)५समुद्रातून हुसकावण्याचे षड्यंत्रपरप्रांतीय व पर्ससीन नेट ट्रॉलर्सवाल्यांनी पारंपरिक मच्छिमारांचा व्यवसाय नष्ट केला आहे. तसेच शेकडो वर्षांपासून मासेमारी करणाऱ्या गरीब कष्टकरी पारंपरिक मच्छिमारांना समुद्रातून हुसकावून लावण्याचे षङयंत्र रचले जात असल्याचा आरोप या मोर्चामध्ये मच्छिमारांनी केला.