शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

लोणेरे विद्यापीठालगत माळरानात वणवा, शेकडो झाडे, वन्यजीव भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 02:34 IST

माणगाव तालुक्यातील लोणेरे विद्यापीठालगत माळरानावर वणवा लावण्याचा प्रकार सुरू आहे. अज्ञानी लोकांकडून हे कृत्य केले जात असून, वणव्यात दासभक्तांनी लावलेल्या वृक्षांची होळी होत आहे.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : तालुक्यातील लोणेरे विद्यापीठालगत माळरानावर वणवा लावण्याचा प्रकार सुरू आहे. अज्ञानी लोकांकडून हे कृत्य केले जात असून, वणव्यात दासभक्तांनी लावलेल्या वृक्षांची होळी होत आहे. झाडे जळण्याबरोबरच छोट्या-मोठ्या वन्यप्राण्यांच्या वावरावरही त्याचा परिणाम होत आहे. जनतेमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने या घटना घडत आहेत. या घटनांना चाप लावण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.माणगाव तालुक्यात लहान-मोठे डोंगर, टेकड्या व पठार यावर पावसाळ्यानंतर मोठे गवत दाटीवाटीने उगवलेले असते. या गवताचा तेथील ग्रामस्थांना फार त्रास होत असतो. नाचणी, वरई पिके घेण्यासाठी हे अनावश्यक गवत शेतकऱ्यांना त्रासाचे ठरते. ते काढण्यासाठी नाहक मजुरीवर खर्च येत असतो. येथील शेतकरी परंपरेनुसार गवत व सुका झाडपाला तसेच पालापाचोळा एकत्रित पेटवून राब करीत असतात. त्यामुळे राख निर्माण होऊन पिकाला ती पोषक असते, असा त्यांचा गैरसमज झालेला आहे. मात्र, ही पारंपरिक पद्धत अतिशय चुकीची आहे. त्याऐवजी गवत व पालापाचोळा नांगरून त्यानंतर ते कुजवून विविध प्रकारची पिके घेतल्यास जमिनीचा पोत वाढून पिकांचे उत्पादन वाढू शकते; यासाठी गावागावांत शासनस्तरावर जनजागृती करायची मोहीम हाती घेतली आहे; परंतु बहुसंख्य शेतकरी गवत जाळूनच शेती करतात. हे गवत जाळत असताना तालुक्यात ठिकठिकाणी वणवे लागण्याचे प्रकार दरवर्षी सातत्याने घडत आहेत. सुमारे ९९ टक्के वणवे मानवनिर्मित असून, त्यामुळे जंगलातील वनसंपदा आणि वन्यजीव नष्ट होत असल्याने पर्यावरणाचा समतोल झपाट्याने ढासळत आहे. शेतकऱ्यांनी यासाठी वन व कृषी विभागाचा सल्ला घेतल्यास विविध पिकांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, असे संबंधित खात्याच्या अधिकाºयांनी सांगितले.गेल्या वर्षीदेखील वणव्याने विद्यपीठामधील नारळाची शेकडो झाडे जाळून खाक झाली होती. या ठिकाणी विद्यपीठाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. हे संपूर्ण क्षेत्र माळरान भागात असल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. झाडे-झुुडपे असल्यामुळे वन्यप्राण्यांसाठी येथे पोषक वातावरण आहे. तर या ठिकाणी पडीक जमिनींमध्ये परिसरातील गावातील पाळीव जनावरांच्या चाºयासाठी गवत असून, त्या ठिकाणी शेकडो जनावरे चरत असतात.वणव्यांकडे वनविभागाचे दुर्लक्षप्रत्येक वर्षी डोंगरांना लागलेले वणवे विझविण्यासाठी रात्रीच्या वेळीही स्थानिक नागरिक जीवाची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. आग लागल्याची माहिती काही निसर्गप्रेमींना समजताच त्या ठिकाणी धाव घेतात.मात्र, अपुºया मनुष्यबळामुळे काही वेळा आग आटोक्यात आणण्यास उशीर होतो, तोपर्यंत बहुतांश डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला असतो. लागलेला वणवा विझविण्यासाठी वनविभागाकडून म्हणावे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत.वनविभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनेची गरजजानेवारी महिन्यानंतर विद्यापीठ प्रशासन आणि वनविभागाने योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये शेकडो एकर क्षेत्र खाक होते.तर काही संकुचित विचाराच्या लोकांकडून जाणीवपूर्वक विद्यपीठ परिसरातील माळरान पेटवून दिले जात आहेत. वणव्यांमुळे अनेक वन्यप्राण्यांचे जीव जात आहेत.तर समर्थ सदस्यांनी लागवड केलेले वृक्ष जळून खाक होत आहेत. वणव्यात लाखोंचे नुकसान होत आहे.हे नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि वनविभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेची आहे.जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीरया परिसरातील शेकडो पाळीव जनावरे या माळरानावर क्षेत्रातील चाºयावर अवलंबून असतात. या क्षेत्रातील मुबलक चाºयामुळे मेअखेरपर्यंत सुकलेला चारा या जनावरांना उपलब्ध असतो. मात्र, वणवा लावण्याच्या प्रकारामुळे जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :Raigadरायगडfireआग