शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आगरदांडा बंदराचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:07 IST

रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ६० टक्के पूर्ण; विकासकामामुळे स्थानिकांना मिळणार रोजगार; रेल्वेमार्गाचे कामही लवकरच

मुरुड जंजिरा : केंद्र व राज्य शासनाची गुंतवणूक असणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून २०२० पर्यंत आगरदांडा बंदरातील सर्व कामे पूर्ण होतील व दिघी बंदराप्रमाणे या ठिकाणीसुद्धा मोठ्या जहाजांची रेलचेल सुरू होणार आहे. सुमारे ३५०० कोटींची गुंतवणूक असणाºया आगरदांडा व दिघी प्रकल्पामध्ये जेएनपीटीच्या धर्तीवर या बंदराच्या विकासावर भर दिला जात असून बंदराला आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यावर प्रशासनाचा जोर दिसून येत आहे.आगरदांडा येथून मोठ्या जहाजातून उतरणारा माल विविध ठिकाणी पोहोचविण्यासाठी आगरदांडा ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिट चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असून ६० टक्के काम आतापर्यंत झाले आहे. सावली ते मांदाड पुलापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर तळे ते इंदापूरचेसुद्धा काम प्रगतिपथावर आहे.आगरदांडा हे गाव पूर्वीपासून वसलेले असून चौपदरीकरणात स्थानिकांच्या घराला धक्का पोहोचू नये, यासाठी डोंगर फोडून अंतर्गत भुयारी मार्गाद्वारे थेट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आगरदांडा येथून रोहा येथे रेल्वे रूळ टाकण्याचासुद्धा बंदर विकासात समावेश असून पुढील टप्यात हे काम मार्गी लागणार आहे.आगरदांडा बंदर जेएनपीटी हस्तांतरित करणार, असा कल होता. परंतु आता सदरचे बंदर अदानी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज् घेणार असल्याचे दिघी पोर्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बंदराच्या विकासाठी लागणाºया सर्व पूरक बाबी तातडीने पूर्ण करण्याचा केंद्र शासनाचा कल आहे. काँक्रिट रस्त्याप्रमाणे लवकरच रेल्वे विकासाचे कामसुद्धा मार्गी लागणार आहे. जहाजातून उतरवलेला माल रेल्वे व रस्त्याद्वारे नियोजित ठिकाणी पोहोचविण्यासाठी पूरक मार्ग पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. दिघी आगरदांडा बंदर संपूर्ण विकसित झाल्यावर मुरुड तालुक्याचे महत्त्व वाढणार असून नवीन औद्योगिक क्रांती होणार आहे. स्थानिकांना रोजगार देण्यात येणार आहे.जहाजातून माल उतरवण्याची लागणारी विविध पदेसुद्धा येथे भरली जाणार आहेत. बंदराच्या विकासावर केंद्र सरकार कोट्यवधींची गुंतवणूक करून एक मोठे विशाल बंदर विकसित करीत आहे. बंदराच्या विकासामुळे स्थानिकांना चांगले रस्ते त्याचप्रमाणे रेल्वे सुविधेचा लाभ मिळणार आहे. रस्त्याची कामे पूर्ण होताच रेल्वेच्या कामाला गती येणार आहे. सदरचे बंदर लवकरच विकसित होऊन स्थानिकांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा स्थानिक सुशिक्षित तरुणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.सध्या दिघी पोर्टचे काम काही अंशी पूर्ण झाले असून येथे तुरळकच जहाजे येतात. परंतु आगरदांडा बंदराचा विकास झाल्यास मोठ्या जहाजांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे मुरुड तालुक्याच्या नावलौकिकात भर पडणार आहे. काँक्रिट रस्त्याची कामे वेगाने सुरू असून बदलत्या घडामोडीमुळे लवकरच बंदर परिसराचा कायापालट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.