शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

ओलमण परिसरात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: March 30, 2016 01:20 IST

रायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही

- कांता हाबळे,  नेरळरायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. जवळच्या विहिरी आटल्याने दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी चढाव चढत आणावे आहे. काही जण तर बैलगाडीने पाणी आणताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाने लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता ओलमण भागातील ओलमण, पेंढरी, तेलंगवाडी, बोडशेतं, चाहूची वाडी या टंचाईग्रस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.कर्जत तालुक्यात शासनाने पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यात ३४ गावे व ४१ वाड्या आहेत. त्यात ओलमण गावाचाही समावेश आहे. मात्र आजूबाजूच्या वाड्यांचा समावेश नाही. परंतु तालुक्यात अद्याप एकाही गावाला शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात सुरुवात झाली नाही. ओलमण गावासाठी १९९८ मध्ये एक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. मुरबाड तालुक्यातील पाटगाव हद्दीतील ओहळातून हा पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना नादुरु स्त आहे. तेव्हापासून पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. ओलमण गावात ८० ते ८५ घरांची वस्ती असून, येथील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. तेलंगवाडी, बोंडशेतं, पेंढरी, कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूची वाडी या आदिवासी वाड्यांमधील महिलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरी व बंधारे आटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओलमण गावापासून एक ते दीड किमी अंतरावरून मोठा चढाव चढत महिलांना पाणी आणावे लागत आहे.कर्जतमध्ये टँकर नाहीशासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु यात कोणाला पाणी मिळते तर कोणाला मिळत नाही. चांगल्या दर्जाचे पाणी नसल्याने या पाण्याने आजाराचे प्रमाणही वाढते, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. परंतु अद्याप शासनाकडून कर्जत तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याने लवकर सुरु करावा.कर्जत तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविला आहे. आ. सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईसंदर्भात बैठक घेतली होती. यात फक्त ओलमण गावाचाच समावेश आहे. माणसे पाठवूनही वाड्यांचा समावेश या टंचाई आराखड्यात केला नाही. -अशोक थुले, गटविकास अधिकारी प. सं. कर्जत.दरवर्षीप्रमाणे आमच्या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास असणाऱ्या विहिरी आटल्या असून, महिलांना दीड ते दोन किमी अंतरावरून चढाव चढून पाणी आणावे लागत आहे. या भागातील कायमसाठी पाणीटंचाई सोडविण्यासाठी ओलमण गावालगत पाझर तलाव बांधणे गरजेचे आहे, जेणेकरून कायमचा पाणीप्रश्न सुटेल. - दादा मनोहर पादीर, माजी सरपंच, ओलमण