शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

ओलमण परिसरात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: March 30, 2016 01:20 IST

रायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही

- कांता हाबळे,  नेरळरायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. जवळच्या विहिरी आटल्याने दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी चढाव चढत आणावे आहे. काही जण तर बैलगाडीने पाणी आणताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाने लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता ओलमण भागातील ओलमण, पेंढरी, तेलंगवाडी, बोडशेतं, चाहूची वाडी या टंचाईग्रस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.कर्जत तालुक्यात शासनाने पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यात ३४ गावे व ४१ वाड्या आहेत. त्यात ओलमण गावाचाही समावेश आहे. मात्र आजूबाजूच्या वाड्यांचा समावेश नाही. परंतु तालुक्यात अद्याप एकाही गावाला शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात सुरुवात झाली नाही. ओलमण गावासाठी १९९८ मध्ये एक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. मुरबाड तालुक्यातील पाटगाव हद्दीतील ओहळातून हा पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना नादुरु स्त आहे. तेव्हापासून पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. ओलमण गावात ८० ते ८५ घरांची वस्ती असून, येथील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. तेलंगवाडी, बोंडशेतं, पेंढरी, कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूची वाडी या आदिवासी वाड्यांमधील महिलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरी व बंधारे आटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओलमण गावापासून एक ते दीड किमी अंतरावरून मोठा चढाव चढत महिलांना पाणी आणावे लागत आहे.कर्जतमध्ये टँकर नाहीशासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु यात कोणाला पाणी मिळते तर कोणाला मिळत नाही. चांगल्या दर्जाचे पाणी नसल्याने या पाण्याने आजाराचे प्रमाणही वाढते, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. परंतु अद्याप शासनाकडून कर्जत तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याने लवकर सुरु करावा.कर्जत तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविला आहे. आ. सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईसंदर्भात बैठक घेतली होती. यात फक्त ओलमण गावाचाच समावेश आहे. माणसे पाठवूनही वाड्यांचा समावेश या टंचाई आराखड्यात केला नाही. -अशोक थुले, गटविकास अधिकारी प. सं. कर्जत.दरवर्षीप्रमाणे आमच्या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास असणाऱ्या विहिरी आटल्या असून, महिलांना दीड ते दोन किमी अंतरावरून चढाव चढून पाणी आणावे लागत आहे. या भागातील कायमसाठी पाणीटंचाई सोडविण्यासाठी ओलमण गावालगत पाझर तलाव बांधणे गरजेचे आहे, जेणेकरून कायमचा पाणीप्रश्न सुटेल. - दादा मनोहर पादीर, माजी सरपंच, ओलमण