शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

शेतकऱ्यांना लागली कर्जफेडीची चिंता

By admin | Updated: May 6, 2015 23:31 IST

कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे.

राहुल देशमुख, नेरळकर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे. पाणी गळतीमुळे बंधारा कोरडा पडत आहे. परिणामी बंधाऱ्याचे पाणी मिळेल म्हणून केलेली भाजीपाला शेती सुकून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी आहेत. तीन वर्षांपूर्वी भीमाशंकर डोंगरात उगम पावलेल्या चिल्हार नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे असते. परिणामी नांदगाव खांडसपासून कोलिवलीपर्यंतच्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. चिल्हार नदीच्या मार्गात असलेल्या गावांना पाण्याचा उगम निर्माण व्हावा, म्हणून राज्य सरकारने पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नदीमध्ये कोल्हापूर टाईपचे सिमेंट बंधारे बांधण्याचा कार्यक्र म हाती घेतला होता. साधारण ५० मीटर लांबीचा सिमेंट बंधारा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून पत्र्याची वाडी - लोभेवाडी येथे बांधला होता. कोल्हापूर टाईपचे बंधारे अशा कोरड्या असलेल्या नदीमध्ये पाणी साठवून ठेवण्यात महत्त्वाचे ठरले होते. कारण पत्र्याची वाडीतील अनेक शेतकरी यांनी बंधाऱ्यात अडविलेल्या पाण्याचा वापर भाजीपाला पिकविण्यासाठी करीत होते. किमान १५ शेतकरी या भागात भाजीपाला शेतीचे नियोजन करीत असताना यावर्षी बंधारा पाणी गळतीमुळे कोरडा पडला आहे. एप्रिल महिन्याआधी बंधारा कोरडा पडल्याने भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.परिणामी भाजीपाला शेतीसाठी प्रसंगी कर्ज काढून शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर संकट आले आहे. यावेळी बंधारा लवकर रिकामा होईल, असे माहीत असते तर भाजीपाला शेती केली नसती, असे जैतू सका पारधी या शेतकऱ्याने सांगितले. आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न कायम असताना यावर्षी पाणी गळतीची बाब लक्षात आली. आता पाटबंधारे विभागाने त्यावर पावसाळ्याआधी उपाययोजना करावी म्हणजे पुढच्या वर्षी अशी स्थिती पुन्हा भाजीपाला शेतकरी यांच्यावर येणार नाही, अशी अपेक्षा पारधी यांनी व्यक्त केली आहे.