शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शेतकऱ्यांना लागली कर्जफेडीची चिंता

By admin | Updated: May 6, 2015 23:31 IST

कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे.

राहुल देशमुख, नेरळकर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे. पाणी गळतीमुळे बंधारा कोरडा पडत आहे. परिणामी बंधाऱ्याचे पाणी मिळेल म्हणून केलेली भाजीपाला शेती सुकून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी आहेत. तीन वर्षांपूर्वी भीमाशंकर डोंगरात उगम पावलेल्या चिल्हार नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे असते. परिणामी नांदगाव खांडसपासून कोलिवलीपर्यंतच्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. चिल्हार नदीच्या मार्गात असलेल्या गावांना पाण्याचा उगम निर्माण व्हावा, म्हणून राज्य सरकारने पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नदीमध्ये कोल्हापूर टाईपचे सिमेंट बंधारे बांधण्याचा कार्यक्र म हाती घेतला होता. साधारण ५० मीटर लांबीचा सिमेंट बंधारा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून पत्र्याची वाडी - लोभेवाडी येथे बांधला होता. कोल्हापूर टाईपचे बंधारे अशा कोरड्या असलेल्या नदीमध्ये पाणी साठवून ठेवण्यात महत्त्वाचे ठरले होते. कारण पत्र्याची वाडीतील अनेक शेतकरी यांनी बंधाऱ्यात अडविलेल्या पाण्याचा वापर भाजीपाला पिकविण्यासाठी करीत होते. किमान १५ शेतकरी या भागात भाजीपाला शेतीचे नियोजन करीत असताना यावर्षी बंधारा पाणी गळतीमुळे कोरडा पडला आहे. एप्रिल महिन्याआधी बंधारा कोरडा पडल्याने भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.परिणामी भाजीपाला शेतीसाठी प्रसंगी कर्ज काढून शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर संकट आले आहे. यावेळी बंधारा लवकर रिकामा होईल, असे माहीत असते तर भाजीपाला शेती केली नसती, असे जैतू सका पारधी या शेतकऱ्याने सांगितले. आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न कायम असताना यावर्षी पाणी गळतीची बाब लक्षात आली. आता पाटबंधारे विभागाने त्यावर पावसाळ्याआधी उपाययोजना करावी म्हणजे पुढच्या वर्षी अशी स्थिती पुन्हा भाजीपाला शेतकरी यांच्यावर येणार नाही, अशी अपेक्षा पारधी यांनी व्यक्त केली आहे.