शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये

By admin | Updated: August 10, 2015 23:46 IST

जागतिकीकरण, पर्यावरण यांच्यामुळे येणारे बदल समस्या म्हणून उभे राहात असताना, संकटाला सामोरे जाण्याचे धारिष्ट सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग

अलिबाग: जागतिकीकरण, पर्यावरण यांच्यामुळे येणारे बदल समस्या म्हणून उभे राहात असताना, संकटाला सामोरे जाण्याचे धारिष्ट सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारु नये असे मत ज्येष्ठ कादंबरीकार आनंद विंगकर यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.विद्यार्थ्यांमधील भाषा व साहित्यगुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने येथील जे.एस.एम्. कॉलेजमध्ये दरवर्षी ‘भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळ’ची स्थापना करण्यात येते. यंदाच्या या स्थापनेच्या निमित्ताने कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात असलेल्या ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’या कादंबरीचे लेखक आनंद विंगकर यांना विशेष निमंत्रित करुन ‘लेखक आपुल्या भेटीला’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते ‘भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील उपस्थित होते. त्यावेळी कादंबरीकार विंगकर हे बोलत होते. विंगकर यांनी आपला कादंबरी लेखनाचा अनुभव कथन करुन, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ न कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रकाश टाकला.यावेळी आयोजित ‘पाऊ स-कविता वाचन’ या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ‘पाऊ स’ या विषयावर आधारित स्वरचित व मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या. पावसाची विविध रुपे चित्रित करणाऱ्या या कवितांनी कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. यावेळी मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए.मराठीची विद्यार्थिनी हर्षला महाजन हिने केले तर एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थिनी मनाली घरत हिने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.नीलकंठ शेरे, प्रा.जयेश म्हात्रे, प्रा.कपिल कुलकर्णी, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.सुप्रिया धुमाळ आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)