शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये

By admin | Updated: August 10, 2015 23:46 IST

जागतिकीकरण, पर्यावरण यांच्यामुळे येणारे बदल समस्या म्हणून उभे राहात असताना, संकटाला सामोरे जाण्याचे धारिष्ट सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग

अलिबाग: जागतिकीकरण, पर्यावरण यांच्यामुळे येणारे बदल समस्या म्हणून उभे राहात असताना, संकटाला सामोरे जाण्याचे धारिष्ट सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारु नये असे मत ज्येष्ठ कादंबरीकार आनंद विंगकर यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.विद्यार्थ्यांमधील भाषा व साहित्यगुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने येथील जे.एस.एम्. कॉलेजमध्ये दरवर्षी ‘भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळ’ची स्थापना करण्यात येते. यंदाच्या या स्थापनेच्या निमित्ताने कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात असलेल्या ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’या कादंबरीचे लेखक आनंद विंगकर यांना विशेष निमंत्रित करुन ‘लेखक आपुल्या भेटीला’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते ‘भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील उपस्थित होते. त्यावेळी कादंबरीकार विंगकर हे बोलत होते. विंगकर यांनी आपला कादंबरी लेखनाचा अनुभव कथन करुन, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ न कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रकाश टाकला.यावेळी आयोजित ‘पाऊ स-कविता वाचन’ या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ‘पाऊ स’ या विषयावर आधारित स्वरचित व मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या. पावसाची विविध रुपे चित्रित करणाऱ्या या कवितांनी कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. यावेळी मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए.मराठीची विद्यार्थिनी हर्षला महाजन हिने केले तर एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थिनी मनाली घरत हिने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.नीलकंठ शेरे, प्रा.जयेश म्हात्रे, प्रा.कपिल कुलकर्णी, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.सुप्रिया धुमाळ आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)