शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कर्जमाफीसाठी शेतकºयांना एकच नियम लावावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 03:58 IST

राज्य सरकारने शेतकºयांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही निकष लावले आहेत; परंतु या कर्जमाफीचा फायदा कोकणातील शेतकºयांना

नेरळ : राज्य सरकारने शेतकºयांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही निकष लावले आहेत; परंतु या कर्जमाफीचा फायदा कोकणातील शेतकºयांना विशेषत: रायगड जिल्ह्यातील शेतकºयांना होताना दिसत नाही.जिल्ह्यातील शेतकरी सधन आहेत, असेही नाही; परंतु दर हंगामाला उसनवारी करून घरातील सोने-नाणे गहाण ठेवून किंवा वेळ प्रसंगी जमिनीचा तुकडा विकून, त्यातून शेतकरी कर्जाचे हफ्ते नियमित भरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सरकार याच शेतकºयांना फक्त २५ टक्के अनुदान, तर जे शेतकरी कर्जाची परतफेडच करीत नाहीत, त्यांना मात्र दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करणार असल्याने येथील शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने सर्व शेतकºयांना प्रत्येकी दीड लाख अनुदान द्यावे, अशी मागणी शेकापचे जिल्हाचिटणीस विलास थोरवे यांनी केली आहे.शासनाने जून २०१६पर्यंत कर्ज परतफेड करणाºया शेतकºयाला २५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मात्र ज्या शेतकºयांनी नियमित हफ्ते भरलेच नाहीत, अशा शेतकºयांना मात्र दीड लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे जो शेतकरी पोटाला चिमटा काढून नियमित कर्जफेडीचे हफ्ते भरतो. तो मात्र शासनाच्या या निकषांमुळे वंचित राहत आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी पसरून तो निराश झाला आहे.मुळातच कर्जत तालुक्यातील जमीन रिलायन्स, एचपीसीएल यासारख्या कंपन्यांच्या पाइपलाइनसाठी बळजबरीने शेतकºयांकडून संपादित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी पिचलेला आहे. त्यातच शासनाच्या या दिशाभूल करणाºया या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकरी अजूनच हवालदिल झाला आहे. शासनाने जर जिल्ह्यातील या शेतकºयांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही, तर या शेतकºयांना भविष्यात शेती करणेही अवघड होईल. तरी शासनाने जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांच्या खात्यात दीड लाख अनुदान भरावे, अशी मागणी शेकापचे जिल्हाचिटणीस विलास थोरवे यांनी शासनाकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास, आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे, तसेच स्थानिक आमदार सुरेश लाड, आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार बाळाराम पाटील यांनी विधानसभा व विधानसभेत या विरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही केले आहे.- कर्जमाफीसाठी आॅनलाइन फॉर्म भरणे शेतकºयांना बंधनकारक केले आहे. मात्र, ज्या ठिकाणी ही फॉर्म भरण्याची सेंटर्स आहेत. मात्र, त्या ठिकाणी इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यातच काहींचे आधार कार्ड नसल्यानेही अडथळे येत आहेत.२०१५ -१६, २०१६-१७च्याअगोदर ज्यांनी कर्ज घेऊन परतफेड केली नाही, त्यांना पूर्ण कर्जमाफी तर ज्यांनी २०१५-१६, २०१६-१७पर्यंत कर्ज घेऊन, ३१ जुलै २०१७पर्यंत कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकºयांना मात्र फक्त २५ टक्केच कर्जमाफी (अनुदान) मिळणार आहे आणि ज्यांनी फक्त १५ हजार रु पये कर्ज घेतले आहे, त्यांचे संपूर्ण म्हणजेच १५ हजारांचे कर्ज माफ होणार आहे.- बी. आर. नांदगावकर,कर्जमाफी विभागीय अधिकारी