शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

रायगड जिल्ह्यातील तापमानात घसरण

By admin | Updated: January 10, 2017 05:56 IST

तालुक्यासह जिल्ह्यातील उर्वरित भागातही गेले काही दिवस तापमान कमालीचे घसरले आहे. गेल्या सप्ताहापासून तर तापमान १६ अंशांपर्यंत

रोहा : तालुक्यासह जिल्ह्यातील उर्वरित भागातही गेले काही दिवस तापमान कमालीचे घसरले आहे. गेल्या सप्ताहापासून तर तापमान १६ अंशांपर्यंत तर कधी यापेक्षाही खाली आल्याची नोंद झाली आहे. यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा गारठला आहे. थंडीमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.यंदा वेळेत दीपावली सणाच्या दरम्यान थंडीचे अगमन झाले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात अचानक बदल घडत गेले, तापमान अचानक १६ अंशांहून खाली आल्याने थंडीचा जोरदार कडाका पडला आहे, वाढीस लागलेल्या या थंडीचा सामना करताना सर्वांचीच तारांबळ उडत आहे. सायंकाळी ६ नंतर सूर्य मावळताच थंडीचा जोर वाढत असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. स्वेटर, मफलर, कानटोप्या आदी गरम कपड्यांची गरज भासत आहे. भल्या पहाटे औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीसाठी जाणाऱ्या कामगारांची कडाक्याच्या थंडीत त्रेधातिरपीट उडत आहे. दररोज धुक्याच्या छायेतून यांना आपली वाट काढताना त्रास सहन करावा लागत आहे. परप्रांतातून मोलमजुरी साठी कोकणात आलेली असंख्य कुटुंबे झोपड्यांमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची लहान मुले तर या थंडीत अजारी पडत आहेत. तर सध्या रोहा तालुक्यात थंडीमुळे खोकला, सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा हा कडाका वाढण्याची शक्यता आहे.महाडमध्ये थंडी वाढली च्दासगाव : गेल्या काही दिवसांपासून महाडमध्ये चांगली गुलाबी थंडी पडली आहे. रात्री शेकोटीवर शेक घेणे, तर सकाळी कोवळ्या उन्हात बसण्याचा आनंद लोक घेत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. या गुलाबी थंडीमुळे परिसरात पहाटे धुक्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून, मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणारे वाहनचालक या दाट धुक्यामुळे त्रस्त झाले आहेत. थंडी वाढल्यामुळे याचा कडधान्य शेतीला चांगला फायदा होणार असून, पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे उत्पन्न चांगले येईल, या अपेक्षेने येथील शेतकरी सुखावला आहे.गेल्या १५ दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून महाडकर थंडीचा आनंद घेत आहेत. महाड तालुक्यातील रवाडी पट्टा आणि माणगांव तालुक्यातील दक्षिण भाग या परिसरात कडधान्य शेती केली जाते. तूर, मूग, मटकी, पावटा, वाल, हरभरा या कडधान्यांचा हा परिसर आगार आहे. दाट धुक्यामुळे या कडधान्य शेतीला पोषक वातावरण निर्माण झाले झाले आहे.