शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

रायगड जिल्ह्यातील तापमानात घसरण

By admin | Updated: January 10, 2017 05:56 IST

तालुक्यासह जिल्ह्यातील उर्वरित भागातही गेले काही दिवस तापमान कमालीचे घसरले आहे. गेल्या सप्ताहापासून तर तापमान १६ अंशांपर्यंत

रोहा : तालुक्यासह जिल्ह्यातील उर्वरित भागातही गेले काही दिवस तापमान कमालीचे घसरले आहे. गेल्या सप्ताहापासून तर तापमान १६ अंशांपर्यंत तर कधी यापेक्षाही खाली आल्याची नोंद झाली आहे. यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा गारठला आहे. थंडीमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.यंदा वेळेत दीपावली सणाच्या दरम्यान थंडीचे अगमन झाले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात अचानक बदल घडत गेले, तापमान अचानक १६ अंशांहून खाली आल्याने थंडीचा जोरदार कडाका पडला आहे, वाढीस लागलेल्या या थंडीचा सामना करताना सर्वांचीच तारांबळ उडत आहे. सायंकाळी ६ नंतर सूर्य मावळताच थंडीचा जोर वाढत असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. स्वेटर, मफलर, कानटोप्या आदी गरम कपड्यांची गरज भासत आहे. भल्या पहाटे औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीसाठी जाणाऱ्या कामगारांची कडाक्याच्या थंडीत त्रेधातिरपीट उडत आहे. दररोज धुक्याच्या छायेतून यांना आपली वाट काढताना त्रास सहन करावा लागत आहे. परप्रांतातून मोलमजुरी साठी कोकणात आलेली असंख्य कुटुंबे झोपड्यांमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची लहान मुले तर या थंडीत अजारी पडत आहेत. तर सध्या रोहा तालुक्यात थंडीमुळे खोकला, सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा हा कडाका वाढण्याची शक्यता आहे.महाडमध्ये थंडी वाढली च्दासगाव : गेल्या काही दिवसांपासून महाडमध्ये चांगली गुलाबी थंडी पडली आहे. रात्री शेकोटीवर शेक घेणे, तर सकाळी कोवळ्या उन्हात बसण्याचा आनंद लोक घेत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. या गुलाबी थंडीमुळे परिसरात पहाटे धुक्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून, मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणारे वाहनचालक या दाट धुक्यामुळे त्रस्त झाले आहेत. थंडी वाढल्यामुळे याचा कडधान्य शेतीला चांगला फायदा होणार असून, पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे उत्पन्न चांगले येईल, या अपेक्षेने येथील शेतकरी सुखावला आहे.गेल्या १५ दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून महाडकर थंडीचा आनंद घेत आहेत. महाड तालुक्यातील रवाडी पट्टा आणि माणगांव तालुक्यातील दक्षिण भाग या परिसरात कडधान्य शेती केली जाते. तूर, मूग, मटकी, पावटा, वाल, हरभरा या कडधान्यांचा हा परिसर आगार आहे. दाट धुक्यामुळे या कडधान्य शेतीला पोषक वातावरण निर्माण झाले झाले आहे.