शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

११ वर्षांनंतरही दरडग्रस्तांना पत्र्याच्या शेडचाच आधार

By admin | Updated: July 26, 2016 04:57 IST

संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते

दासगाव : संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते आणि रोहन या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी झाली होती तर अनेक गावातील हद्दीमध्ये दरडीही कोसळल्या होत्या. आजही गावोगावी कोसळलेले डोंगर महाडकरांच्या मनात दरडीच्या आठवणी ताज्या आहेत. जुई, कोंडीवते आणि रोहन या गावांमध्ये सामाजिक संस्थांनी दरडग्रस्तांना आधार दिला आणि त्यांची घरे उभी राहिली. मात्र दासगावमधील दरडग्रस्त ११ वर्षानंतरही पत्राशेडमध्ये राहण्याच्या नरकयातना भोगत आहेत.२००५ मधला २५ जुलै हा दिवस महाडकरांसाठी काळ्या दिवसाप्रमाणे उगवला. दिवस-रात्र पावसाच्या धारा कोसळत होत्या. या कोसळणाऱ्या पावसात एकमेकांशी होणारा संपर्क तुटला होता. जलमय महाड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला होता. महाड शहरात १० ते १५ फुट पुराचे पाणी साचले होते. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. आणि २५ जुलैच्या संध्याकाळी डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावांसाठी मात्र काळरात्र ठरली. पुराचा जोर कायम असतानाच रात्रीत दासगांव, जुई, रोहन, कोंडीवते या गावांमध्ये दरड कोसळली. या दरडीखाली १९० निष्पाप ग्रामस्थ गाडले गेले. दरडीखाली बेपत्ता झालेल्या मृतांना दरडग्रस्तांना भावना व मृतदेहाची होणारी विटंबना लक्षात घेवून शासनाने न सापडलेल्या ग्रामस्थांना मृत जाहीर केले. सव, कोथेरी, जंगमवाडी, चोचिंदे, करंजखोल दाभोळ आदि गावांमध्ये रहिवाशी वस्तीला दरडीचा धोका निर्माण झाला होता. पुराचा आणि दरडीने महाडमध्ये हाहाकार माजवला होता. दानशूर नागरिक आणि सामाजिक संस्थांनी महाडसाठी मदतीचे दरवाजे खुले केले होते. जनकल्याण ट्रस्टने दासगाव आदिवासी वाडी, कोंडीवते, कुर्ला दंडवाडी आणि रोहन, जुई या गावामध्ये जनकल्याण ट्रस्ट, लालबागचा राजा ट्रस्ट, प्राईड इंडिया आदि सामाजिक संस्थांनी या दरडग्रस्तांसाठी घरे बांधून दिली. मात्र शासनाने मृतांच्या परिजनांना दिलेली मदत आणि तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पत्रा शेडव्यतिरिक्त काहीच दिले नाही. यामुळे आजही दासगांव दरडग्रस्त पक्क्या घरांच्या प्रतीक्षेत पत्राशेडच्या निवाऱ्यामध्ये जीवन कंठीत आहेत. दरड कोसळून उजाड झालेले डोंगर, जुई दासगाव, कोंडीवते या गावामधील बोडके झालेले डोंगर आजही या दरडीची आणि दरडीखाली गाडले गेलेल्या परिजनांच्या आठवणी २६ जुलै उजाडला की ताज्या होतात. (वार्ताहर)‘जनकल्याण’ची मदतजुई, कोंडीवते, दासगाव आणि रोहन या गावामध्ये सुमारे १४२ घरे बांधून दिली. ज्या गावांना अपेक्षित होते त्या गावांमध्ये निर्मल निकेतन कॉलेज आॅफ सोशल वर्क मुंबई येथून समाजसेवेच्या विद्यार्थ्यांकडून आणि जनकल्याणच्या कार्यकर्त्यांमार्फत तालुक्यातील बाधीत गावांचा सर्व्हे करु न मदत पोहोचविण्यात आली. दासगांवच्या या दरडग्रस्तांसाठी मागील दोन महिन्यांच्या दरम्यान शासनाने घरांसाठी जागा दिली आणि ९० हजार रुपये घर बांधण्यासाठी देण्याचे आश्वासन दिले. मात्र घर बांधणीचे हे पैसे आजही दासगाव दरडग्रस्तांना मिळाले नाहीत. यामुळे दासगाव दरडग्रस्त शासनाच्या उदासीनपणामुळे तात्पुरत्या पत्रा शेडमध्ये राहत आहेत.