शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

११ वर्षांनंतरही दरडग्रस्तांना पत्र्याच्या शेडचाच आधार

By admin | Updated: July 26, 2016 04:57 IST

संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते

दासगाव : संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते आणि रोहन या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी झाली होती तर अनेक गावातील हद्दीमध्ये दरडीही कोसळल्या होत्या. आजही गावोगावी कोसळलेले डोंगर महाडकरांच्या मनात दरडीच्या आठवणी ताज्या आहेत. जुई, कोंडीवते आणि रोहन या गावांमध्ये सामाजिक संस्थांनी दरडग्रस्तांना आधार दिला आणि त्यांची घरे उभी राहिली. मात्र दासगावमधील दरडग्रस्त ११ वर्षानंतरही पत्राशेडमध्ये राहण्याच्या नरकयातना भोगत आहेत.२००५ मधला २५ जुलै हा दिवस महाडकरांसाठी काळ्या दिवसाप्रमाणे उगवला. दिवस-रात्र पावसाच्या धारा कोसळत होत्या. या कोसळणाऱ्या पावसात एकमेकांशी होणारा संपर्क तुटला होता. जलमय महाड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला होता. महाड शहरात १० ते १५ फुट पुराचे पाणी साचले होते. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. आणि २५ जुलैच्या संध्याकाळी डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावांसाठी मात्र काळरात्र ठरली. पुराचा जोर कायम असतानाच रात्रीत दासगांव, जुई, रोहन, कोंडीवते या गावांमध्ये दरड कोसळली. या दरडीखाली १९० निष्पाप ग्रामस्थ गाडले गेले. दरडीखाली बेपत्ता झालेल्या मृतांना दरडग्रस्तांना भावना व मृतदेहाची होणारी विटंबना लक्षात घेवून शासनाने न सापडलेल्या ग्रामस्थांना मृत जाहीर केले. सव, कोथेरी, जंगमवाडी, चोचिंदे, करंजखोल दाभोळ आदि गावांमध्ये रहिवाशी वस्तीला दरडीचा धोका निर्माण झाला होता. पुराचा आणि दरडीने महाडमध्ये हाहाकार माजवला होता. दानशूर नागरिक आणि सामाजिक संस्थांनी महाडसाठी मदतीचे दरवाजे खुले केले होते. जनकल्याण ट्रस्टने दासगाव आदिवासी वाडी, कोंडीवते, कुर्ला दंडवाडी आणि रोहन, जुई या गावामध्ये जनकल्याण ट्रस्ट, लालबागचा राजा ट्रस्ट, प्राईड इंडिया आदि सामाजिक संस्थांनी या दरडग्रस्तांसाठी घरे बांधून दिली. मात्र शासनाने मृतांच्या परिजनांना दिलेली मदत आणि तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पत्रा शेडव्यतिरिक्त काहीच दिले नाही. यामुळे आजही दासगांव दरडग्रस्त पक्क्या घरांच्या प्रतीक्षेत पत्राशेडच्या निवाऱ्यामध्ये जीवन कंठीत आहेत. दरड कोसळून उजाड झालेले डोंगर, जुई दासगाव, कोंडीवते या गावामधील बोडके झालेले डोंगर आजही या दरडीची आणि दरडीखाली गाडले गेलेल्या परिजनांच्या आठवणी २६ जुलै उजाडला की ताज्या होतात. (वार्ताहर)‘जनकल्याण’ची मदतजुई, कोंडीवते, दासगाव आणि रोहन या गावामध्ये सुमारे १४२ घरे बांधून दिली. ज्या गावांना अपेक्षित होते त्या गावांमध्ये निर्मल निकेतन कॉलेज आॅफ सोशल वर्क मुंबई येथून समाजसेवेच्या विद्यार्थ्यांकडून आणि जनकल्याणच्या कार्यकर्त्यांमार्फत तालुक्यातील बाधीत गावांचा सर्व्हे करु न मदत पोहोचविण्यात आली. दासगांवच्या या दरडग्रस्तांसाठी मागील दोन महिन्यांच्या दरम्यान शासनाने घरांसाठी जागा दिली आणि ९० हजार रुपये घर बांधण्यासाठी देण्याचे आश्वासन दिले. मात्र घर बांधणीचे हे पैसे आजही दासगाव दरडग्रस्तांना मिळाले नाहीत. यामुळे दासगाव दरडग्रस्त शासनाच्या उदासीनपणामुळे तात्पुरत्या पत्रा शेडमध्ये राहत आहेत.