शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा

By admin | Updated: October 16, 2016 03:25 IST

तत्कालीन शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन रद्द करून नवीन अंशदान पेन्शन योजना सुरू करुन शिक्षकांवर केलेल्या अन्याच्या

अलिबाग : तत्कालीन शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन रद्द करून नवीन अंशदान पेन्शन योजना सुरू करुन शिक्षकांवर केलेल्या अन्याच्या निषेधार्थ व जुनीच पेन्शन पद्धती अमलात आणावी या मागणी करिता शनिवारी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलावारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे काढला होता. मोर्चाला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून कर्मचारी उपस्थित होते.योजनेत कर्मचाऱ्यांचे वर्तमान आणि भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित नाही. तसेच सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना या नवीन योजनेतून कोणताही लाभ मिळाला नाही. समान काम, समान वेतन कायदा असतानाही काहींना जुनी तर काहींना नवी पेन्शन योजना हे कोणत्या कायदयात बसणार आहे. या नवीन पेन्शन योजनेत सेवानिवृत्तीनंतर मिळणार लाभ हा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या १० टक्के व शासनाच्या मिळणाऱ्या १० टक्के रक्कमेवर आधारीत आहे. निवृत्तीनंतर एकूण जमा राशीच्या ६० टक्के रक्कम मिळणार तर उर्वरित ४० टक्के राशीवर शासनाने इतरत्र गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर उदनिर्वाह करावा लागणार शासनाने ही योजना आणताना महाराष्ट्र नागरी सेवा १९८२ मध्ये सुधारणा असा शब्दप्रयोग करून कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात केला आहे.प्रत्यक्षात नियम १९८२ मधील एकही तरतूद नवीन नियुक्त कर्मचाऱ्यास लागू नाही. यासंबधी विधानसभा व विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला नाही व नवीन कायदाही केला नाही म्हणून ही अन्यायकारक नावीन पेन्शन योजना बंद करून सर्व कर्मचाऱ्यांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलावारे यांनी केली आहे. सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश या मोर्चातून शासनापर्यंत पोहचण्यासाठी व सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ ची मुळ नागरी पेन्शन योजना लागू करा ही एकमेव मागणी घेऊ न हा आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या या मागणीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी संघटनेचे राज्य संघटक अनिल नाचपल्ल, मारोती भोसले, अमोल माने, कपिल टोने आदी उपस्थित होते.(विशेष प्रतिनिधी)