शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

आगरदांडा-सावलीया रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली दुरवस्था

By admin | Updated: May 14, 2017 22:50 IST

मुरुड तालुका हे पर्यटन क्षेत्र असून येथील रस्त्यांची समस्या फार बिकट बनली आहे. आगरदांडा ते सावलीया भागातही बहुतांशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : मुरुड तालुका हे पर्यटन क्षेत्र असून येथील रस्त्यांची समस्या फार बिकट बनली आहे. आगरदांडा ते सावलीया भागातही बहुतांशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.गेले अनेक वर्षे हा रस्ता बनण्यासाठी अनेकांनी बांधकाम खात्याकडे निवेदने देण्यात आली होती. परंतु बांधकाम खात्याने रस्ता बनवण्यासाठी सजगता कधी ही दाखवली गेली नाही. त्या भागातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी आगरदांडा ते खोकरी हा दोन किलोमीटरचा रस्ता बनवून जणूकाही जबाबदारी संपली असे वागत आहेत. त्या रस्त्यावर जागोजागी सहा ठिकाणी पॅच मारण्याचे काम ठेवले आहे. त्या पॅचवर असंख्य खड्डे आहेत. यासंदर्भात बांधकाम खात्याचे उपअभियंता नीलेश खिलारे म्हणाले की, ते पॅच इस्टिमेटमध्ये नसून ते सहा नाही तर पाच आहेत. त्या पॅचवर असंख्य खड्डे असले तरी ते पॅच भरण्यात येणार नाही. परंतु साईटपट्ट्या लवकरात लवकर भरण्यात येतील असे यावेळी सांगितले.पावसाळा सुरु होण्याच्या आत रस्त्यावरचे खड्डे डांबर, खडी मिश्रण करून बुजवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नाहीतर अचानक रस्त्यावर येऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी मिनीडोर रिक्षा संघटनेचे सदस्य पांडुरंग पोटदुखे यांनी दिला आहे.