शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीच्या संकटावर के ली जिद्दीने मात

By admin | Updated: October 15, 2016 06:48 IST

यंदा भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आणि पावसाने जोरदार सुरुवात केली, त्यामुळे बियाणे वाहून गेले. लावणी हंगामात शेतात लावणी केल्यानंतर

विजय मांडे / कर्जतयंदा भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आणि पावसाने जोरदार सुरुवात केली, त्यामुळे बियाणे वाहून गेले. लावणी हंगामात शेतात लावणी केल्यानंतर मुसळधार पाऊस पडू लागल्याने लावलेले भाताचे रोप वाहून गेले तरीही खचून न जाता एका प्रगतशील शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी वापरलेल्या पध्दतीने भात बियाणाचे रोव तयार करून पेर भात पद्धतीने पेरणी के ली आणि भातपीक घेण्याचा निर्णय घेतला. त्या शेतकऱ्याच्या शेतात आता भरघोस भातपीक तयार होत आहे.यंदा चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. वेळेवर पाऊस सुरू झाल्याने बळीराजाने उत्साहात पेरण्या केल्या, काहींनी एसआरटी पद्धतीने पेरण्या केल्या होत्या कारण गेल्या वर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे सुद्धा एसआरटी पद्धतीच्या पेरण्या उपयुक्त ठरल्या होत्या. यंदा पारंपरिक पद्धतीने केलेल्या पेरण्या मुसळधार पावसाने वाहून गेल्या तर एसआरटी पद्धतीने केलेल्या पेरण्यांचे बियाणे अतिपावसाने कुजले. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा पेरण्या करण्याची वेळ आली, परंतु वेळ निघून गेली होती. भातपीक हाती येईल काय, अशी शंका होती. या सर्वावर मात केली ती कोषाणे गावातील प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र तातू ठोंबरे यांनी. ठोंबरे यांनी आपल्या आठ एकर जमिनीवर एसआरटी पद्धतीने भातपीक लावले. लावताना त्यांनी सकाळी अर्धा एकर जमिनीवर पेरले व संध्याकाळी उर्वरित साडेसात एकर जमिनीवर भातपीक लावले. त्यानंतर लगेचच मुसळधार पावसाची सुरु वात झाली, रात्रभर पाऊस पडत होता. ठोंबरे पाच दिवसांनी शेतावर गेले तर सकाळी पेरलेल्या जमिनीतून भात रोपे वर आली, परंतु उर्वरित साडेसात एकर जमिनीतून एकही भात रोप वर आले नाही. पंधरा दिवस वाट पाहिली तरीही भात रोप वर येईना. भात बियाणे कुजून गेले होते. यामुळे ठोंबरे अस्वस्थ झाले, मात्र अचानक त्यांना दोन वर्षांपूर्वी केलेला प्रयोग आठवला. त्यावेळी खेकड्यांनी सर्वच्या सर्व भात रोपे फस्त केली होती. त्यावर कल्पना लढवून भात बियाणाचा रोव करून कीटकनाशक मिसळून ते पेरले आणि भात शेती तारली गेली. त्यांनी सकाळी तो प्रयोग करण्याचा निर्णय पक्का केला. चाळीस किलो भात बियाणाची लागवड के ली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊन आज भाताचे चांगले पीक शेतात दिसू लागले आहे.